शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

विषबाधा प्रकरणाची विभागीय चौकशी लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 23:57 IST

लातूर : विस्तारीत एमआयडीसीतील सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती.

लातूर : विस्तारीत एमआयडीसीतील सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यासाठी पथक नेमले होते. मात्र या पथकाने अद्याप चौकशीचा अहवाल सादर केला नाही. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे १ हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील युनिट क्र. १, २, ३ आणि ४ मधील ३४९ मुला-मुलींना उलट्या, मळमळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, भोजन ठेका असलेल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांनी वसतिगृहावर देखरेख असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने दोनवेळा वसतिगृहाला व्हिजीट करून चौकशी केली असल्याचे सांगितले जाते. मात्र एक महिना उलटत आला तरी अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. अन्न चव नोंदवही, वसतिगृहात त्या दिवशी कोणते कर्मचारी ड्युटीवर होते, अन्नाची चव घेतली होती का? या सर्व अनुषंगाने या पथकाकडून चौकशी होणार आहे. मात्र अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही.(प्रतिनिधी)