शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विषबाधा प्रकरणाची विभागीय चौकशी लटकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 23:57 IST

लातूर : विस्तारीत एमआयडीसीतील सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती.

लातूर : विस्तारीत एमआयडीसीतील सामाजिक न्याय विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ४ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यासाठी पथक नेमले होते. मात्र या पथकाने अद्याप चौकशीचा अहवाल सादर केला नाही. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे १ हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील युनिट क्र. १, २, ३ आणि ४ मधील ३४९ मुला-मुलींना उलट्या, मळमळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, भोजन ठेका असलेल्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांनी वसतिगृहावर देखरेख असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीसाठी लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने दोनवेळा वसतिगृहाला व्हिजीट करून चौकशी केली असल्याचे सांगितले जाते. मात्र एक महिना उलटत आला तरी अद्याप चौकशी पूर्ण झाली नाही. अन्न चव नोंदवही, वसतिगृहात त्या दिवशी कोणते कर्मचारी ड्युटीवर होते, अन्नाची चव घेतली होती का? या सर्व अनुषंगाने या पथकाकडून चौकशी होणार आहे. मात्र अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नाही.(प्रतिनिधी)