शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत, कृषी, पशुसंवर्धन विभाग आठवडाभरात डीआरडीएच्या परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच ...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होईल. त्यापूर्वी नियोजित जागेवरील असलेली कार्यालये स्थलांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण व आरोग्य विभागाचे स्थलांतर झाले असून, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन हे विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) परिसरातील अधिकारी निवासस्थानात पुढील आठवड्यापर्यंत स्थलांतरित होतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदवले यांनी दिली.

घाटीसमोरील डीआरडीएच्या परिसरात कार्यालय स्थलांतरणासाठी केलेल्या निवासस्थानांची दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युतीकरण, सुविधांची पाहणी डाॅ. गोंदवले यांनी सोमवारी केली. तसेच सुंदर माझे कार्यालयअंतर्गत परिसर स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील खासगी भंगार वाहने हटवा, शासकीय भंगार वाहनांची कार्यालयांना अडचण होणार नाही, अशा ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता, निवासस्थानांच्या दुरवस्थेवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डीआरडीए प्रकल्प संचालक कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासाठी योग्य राहील व डीआरडीएचे कार्यालय इतरत्र हलवण्याचे नियोजन ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक संगीताराणी पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता झेड ए. काझी. उपअभियंता डहाळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

---

सोयीचे ठिकाण म्हणून पर्याय

घाटीसमोरचा डीआरडीएच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. शिवाय हे ठिकाण स्थलांतरण व नागरिकांसाठी सोयीस्कर असून, पूर्वी नव्या इमारतीचा प्रस्ताव याच ठिकाणी होता. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, ही जागा बदलून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूस ही इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा जागा बदलचा प्रस्ताव मान्य होताच निविदा प्रक्रिया झाल्यावर कोणतेही अडथळे नको, वेळ वाया जायला नको, यासाठी स्थलांतरणावर जोर दिला जात असल्याचे डाॅ. गोंदावले यांनी सांगितले.