शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

पंचायत, कृषी, पशुसंवर्धन विभाग आठवडाभरात डीआरडीएच्या परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच ...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होईल. त्यापूर्वी नियोजित जागेवरील असलेली कार्यालये स्थलांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण व आरोग्य विभागाचे स्थलांतर झाले असून, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन हे विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) परिसरातील अधिकारी निवासस्थानात पुढील आठवड्यापर्यंत स्थलांतरित होतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदवले यांनी दिली.

घाटीसमोरील डीआरडीएच्या परिसरात कार्यालय स्थलांतरणासाठी केलेल्या निवासस्थानांची दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युतीकरण, सुविधांची पाहणी डाॅ. गोंदवले यांनी सोमवारी केली. तसेच सुंदर माझे कार्यालयअंतर्गत परिसर स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील खासगी भंगार वाहने हटवा, शासकीय भंगार वाहनांची कार्यालयांना अडचण होणार नाही, अशा ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता, निवासस्थानांच्या दुरवस्थेवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डीआरडीए प्रकल्प संचालक कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासाठी योग्य राहील व डीआरडीएचे कार्यालय इतरत्र हलवण्याचे नियोजन ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक संगीताराणी पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता झेड ए. काझी. उपअभियंता डहाळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

---

सोयीचे ठिकाण म्हणून पर्याय

घाटीसमोरचा डीआरडीएच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. शिवाय हे ठिकाण स्थलांतरण व नागरिकांसाठी सोयीस्कर असून, पूर्वी नव्या इमारतीचा प्रस्ताव याच ठिकाणी होता. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, ही जागा बदलून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूस ही इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा जागा बदलचा प्रस्ताव मान्य होताच निविदा प्रक्रिया झाल्यावर कोणतेही अडथळे नको, वेळ वाया जायला नको, यासाठी स्थलांतरणावर जोर दिला जात असल्याचे डाॅ. गोंदावले यांनी सांगितले.