शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शिक्षण विभागाला वसतिगृहांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:01 IST

यंदा ऊ सतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतीगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व तसेच तालुक्यांतील एकाही हंगामी वसतिगृहाचा प्रस्ताव सर्व शिक्षाकडे उपलब्ध नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई :कामगार पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा ऊ सतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतीगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व तसेच तालुक्यांतील एकाही हंगामी वसतिगृहाचा प्रस्ताव सर्व शिक्षाकडे उपलब्ध नाही.कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये व ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावे यासाठी दरवर्षी हंगामी वसतिगृह सुरू केली जातात. परंतु यंदा सदर वसतिगृह सुरू करण्याचा शिक्षण विभागालाच विसर पडला की काय? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पूर्वतयारी म्हणून संभाव्य स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही मोहीम राबवून सर्वेक्षण केले असले तरी, अद्याप अहवाल मात्र एकाही तालुक्याने दिलेला नाही. संबंधित यंत्रणाही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे वस्तीगृह सुरू होणार किंवा नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना तत्काळ शाळेत दाखल करून घेण्याच्या तशा सूचनाही आहेत.