शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरातील अनेक भागांत डेंग्यूचा उद्रेक

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते.

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळले. यामध्ये एकट्या औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या ३५ आहे. तर ग्रामीण भागात अवघे ९ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मनपा, आरोग्य विभागातर्फे विविध भागांमध्ये कोम्ब्ािंग आॅपरेशन हाती घेण्यात आले. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्या ठिकाणी हे शक्य होत नाही, त्या ठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले. याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जोखमीच्या वसाहतींसह उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. जुलै, आॅगस्टमध्ये सर्वाधिक रुग्णपावसाला सुरुवात होत नाही, तोच साथरोगांचा फैलाव सुरू झाला. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण समोर आले. केवळ आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे शहरात १० तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.धूरफवारणी, अ‍ॅबेट टाकणे, कंटेनर सर्वेक्षण यासह जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ क रून कोरडे केले पाहिजे. शिवाय पाण्याचे साठे योग्य पद्धतीने झाकून ठेवावेत. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी