शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

शहरातील अनेक भागांत डेंग्यूचा उद्रेक

By admin | Updated: September 4, 2016 01:05 IST

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते.

औरंगाबाद : शहरात कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूवर नियंत्रण येत नाही. नियंत्रण येण्याऐवजी उलट ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात त्याचा सर्वाधिक फैलाव होत असल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळले. यामध्ये एकट्या औरंगाबाद शहरातील रुग्णांची संख्या ३५ आहे. तर ग्रामीण भागात अवघे ९ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मनपा, आरोग्य विभागातर्फे विविध भागांमध्ये कोम्ब्ािंग आॅपरेशन हाती घेण्यात आले. त्यासाठी खास पथक तयार करण्यात आले. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्या ठिकाणी हे शक्य होत नाही, त्या ठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. गेल्या आठ महिन्यांत डेंग्यूचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले. याशिवाय शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जोखमीच्या वसाहतींसह उच्चभ्रू वसाहतींमधील रहिवाशांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. जुलै, आॅगस्टमध्ये सर्वाधिक रुग्णपावसाला सुरुवात होत नाही, तोच साथरोगांचा फैलाव सुरू झाला. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण समोर आले. केवळ आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे शहरात १० तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळून आले.धूरफवारणी, अ‍ॅबेट टाकणे, कंटेनर सर्वेक्षण यासह जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ क रून कोरडे केले पाहिजे. शिवाय पाण्याचे साठे योग्य पद्धतीने झाकून ठेवावेत. नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी