शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

लोंढा ओसरला !

By admin | Updated: October 30, 2014 00:26 IST

उस्मानाबाद : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी) सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देवू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.

उस्मानाबाद : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (टीईटी) सध्या अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देवू इच्छिणाऱ्यांच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मागीलवर्षी साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र यावर्षी हा आकडा साडेसहा हजारांच्या आतच रेंगाळला आहे.शिक्षक पात्रता परिक्षेकडे मागील वर्षी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात होता. अर्ज भरण्यासाठी रांगाच्या रांगा लागत होत्या. यावर्षी अर्ज भरण्यास एक आॅक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे काही दिवस तुरळक विद्यार्थी अर्ज भरताना दिसत असत. मात्र कालांतराने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत गेली. परंतु गतवर्षीच्या तुलनेमध्ये ही गर्दी अत्यंत कमी आहे. गतवर्षी १२ हजार ५०० अर्ज दाखल झाले होते. परंतु यावेळी केवळ ६ हजार ४१८ जणांनी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ३० आॅक्टोबरही शेवटची तारीख असल्याने या संख्येत थोड्याफार प्रमाणात वाढ होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. १४ डिसेंबर रोजी परीक्षाशिक्षक पात्रता परिक्षेसाठी हजारोंच्या घरात अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच १४ डिसेंबर रोजी यांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना आपापल्या तालुक्यातच अर्ज दाखल करता यावेत, यासाठी यंदा तालुक्याच्याही ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात आले. तसेच मुख्यालय असलेल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागातही अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली असल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपये तिजोरीत४शिक्षक पात्रता परिक्षेसाठी विशिष्ट शुल्क आकारण्यात येत आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी अडीचशे तर दोन पेरसाठी पाचशे रुपये आकारले जातात. तसेच अन्य विद्यार्थ्यांना एका पेपरसाठी ५०० तर दोन पेपरसाठी ८०० रुपये शुल्क आहे. त्यामुळे या शुल्काच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत लाखोंची भर पडण्यास मदत झाली आहे.