बीड : महाशिवरात्रीनिमित्त फराळासाठी बाजारात विविध प्रकारचे फळे, पदार्थ विक्रीसाठी आले होते. गतवर्षीच्या तुलनेत फराळाच्या पदार्थांचे भाव वाढले असले तरी मागणी मात्र जोरात असल्याचे मंगळवारी दिसून आले.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांच्या उत्पादनात तर घट झालीच आहे, शिवाय फळ बागांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षी पेंडखजूर ६० रूपये किलो प्रमाणे विक्री केला जात होता, मात्र यावर्षी यामध्ये २० रूपयाने वाढ होऊन तो ८० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करण्यात आला. कच्चा खारकाचे भाव अधिक असल्यामुळे पेंडखजूरचे भाव वाढल्याचे मुज्जू आत्तार या विक्रेत्याने सांगितले.परराज्यातून ही पेंडखजूर आणण्यात आली होती. तसेच शहरात ५० ते ६० ठिकाणी हातगाडे विक्रेते पेंडखजूर विक्रीसाठी घेऊन बसले होते. तसेच इतर फळे व पदार्थांनाही नागरिकांमधून चांगली मागणी असल्याचे इक्बाल बागवान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केळी : ४० रूपये डझनद्राक्षे :४० ते ६० रू.किलोखरबुज : ३० ते ४० रूपयेडाळींब : ५० ते ६० रू. किलोरताळे : २० ते ३० रू. किलोसफरचंद : ७० ते १०० रू. किलोअल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रताळ्याचे उत्पादन फारसे निघाले नाही. मात्र काही शेतकऱ्यांनी मेहनत करून पिक काढले होते. बाजारात काही ठिकाणीच रताळे विक्रीसाठ ीआले होते. त्याठिकाणी मात्र नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.फळांबरोबरच तळलेला साबुदाणा खरेदी करून भूक भागविण्यावरही भाविकांनी पसंती दिली.४साबुदाण्याच्या भावातही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदार उमेश आजबे यांनी सांगितले.४बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.४शहरातील भाजीमंडई परिसरात चारही रस्ते फळविक्रेते व पदार्थ विक्रेत्यांनी व्यापले होते. तसेच खरेदीसाठी भाविकांची उडालेली झुंबड यामुळे मंडई परिसरात गर्दी दिसून आली.४अंबाजोगाई, परळी, माजलगाव येथील बाजारपेठाही गर्दीने गजबजलेल्या होत्या.
किंमतीत वाढ होऊनही मागणी जोरात
By admin | Updated: February 18, 2015 00:42 IST