शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

आजीबाईचा बटवा अन् कोरोनाला हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:02 IST

रऊफ शेख फुलंब्री : ग्रामीण भागात कोरोना आजारावर विविध गुणकारी औषधी म्हणून आजही आजीबाईचा बटवा प्रसिद्ध आहे. या बटव्यात ...

रऊफ शेख

फुलंब्री : ग्रामीण भागात कोरोना आजारावर विविध गुणकारी औषधी म्हणून आजही आजीबाईचा बटवा प्रसिद्ध आहे. या बटव्यात पूर्वीपासून पारंपरिक औषधींचा खजिना दडलेला असल्याचे दिसून येते.

गेल्या वर्षभरापासून देशात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. ग्रामीण भागात मात्र या रोगापासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवण्यासाठी आजीबाई पारंपरिक पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध वनौषधींचा वापर करीत आहेत. यामुळे याचा अनेक कुटुंबांना फायदाही होत आहे.

ॲलोपॅथी उपचार पद्धती येण्यापूर्वी पूर्वीपासून भारतात पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जात होते. आजही ग्रामीण भागात वृद्ध लोक याच पद्धतीचा वापर करीत असल्याचे दिसते. ताप, खोकला, सर्दी, डोके दुखणे, दात दुखणे आदी दुखण्यांवर आजही ग्रामीण भागात ॲलोपॅथीपेक्षा पारंपरिक उपचार पद्धतींनाच महत्त्व दिले जाते. गूळ, हळद, अद्रक, तुळशीची पाने टाकून करण्यात येणारा काढा तर कोरोना काळात शहरातही लोक मोठ्या प्रमाणात सेवन करीत असल्याचे दिसून आले. याचप्रमाणे गुळवेल या वनस्पतीलाही ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून आले.

फुलंब्री तालुक्यातील परिस्थिती...

एकूण कोरोना संक्रमित रुग्णसंख्या - १६६४,

एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या - १५१३

एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण - ७४

कोरोनामुळे एकूण मृत्यूसंख्या - ७७

कोट

जुन्या काळात अनेक रोगांवर केवळ आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जात होता. त्यानुसार आजच्या घडीला कोरोनासारखा आजार आलेला आहे. लोकांनी हळद व दुधाचा काढा बनवून सेवन करावा. याने शरीराची अंतर्गत शक्ती वाढते व कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत होईल.

-

- कमलबाई गुलाबराव चव्हाण, किनगाव

कोट

कोरोनासारख्या नवीन आजारावर महत्त्वाचे म्हणजे गुळवेलच्या काढ्याचे नियमित सेवन करावे. याचा फायदा होऊन, शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन शरीर रोगमुक्त राहते. सर्दी व तापातही हा काढा रामबाण उपाय आहे.

- विमलबाई संतराम ठोंबरे, पिरबावडा.

कोट

रोगांपासून शरीरास दूर ठेवण्याकरिता अद्रकच्या रसाचे सेवन करणे तसेच चहामध्ये मिरे, तुळशीची पाने टाकून पिणे हे फायदेशीर आहे. पूर्वीपासून याचा वापर केला जातो. यामुळे रोगराई दूर ठेवण्यास मदत होते.

- वेणुबाई नागोराव ढंगारे, फुलंबी

कोट

कोरोनासारख्या आजाराच्या काळात आयुर्वेदिक औषधीला मोठे महत्त्व आहे. प्रत्येक नागरिकांनी सकाळी गरम पाण्यात हळद टाकून दिवसभर वारंवार पिल्याने फायदा होतो. तसेच तुळशीची पाने, हळद, काळे मिरे, पुदिना यांचा काढा तयार करून नियमित सेवन करावा. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- डॉ. अय्याज पटेल, होमिओपॅथी तज्ज्ञ

कशाचा, काय उपयोग

सुंठ (अद्रक)

आजीबाईच्या बटव्यात पूर्वीपासून सुंठ (अद्रक) हा घटक राहिलेला आहे. घसा खवखवायला लागला किंवा खोकला, सर्दीत सुंठ चहात टाकून दिल्यानंतर आराम पडतो. तसेच खोकल्यासाठी मधात सुंठ उगाळून दिल्यानंतरही खूप फायदा होतो.

काळी मिरी, लवंग

आजीबाईच्या बटव्यातील काळी मिरी व लवंग या मसाल्याच्या पदार्थांनाही फार महत्त्व आहे. ताप, खोकल्यासाठी करण्यात येणाऱ्या काढ्यात याचा वापर केला जातो. तसेच दातदुखीसाठी लवंग तोंडात ठेवतात.

गुळवेल

ग्रामीण भागात अनेक आजारांवर गुळवेल प्रभावीपणे वापरतात. ताजा गुळवेल व वाळवून ठेवलेल्या गुळवेलीच्या कांड्या सर्दी, ताप, खोकला, तसेच शरीरात प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत.