शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

विषमतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्था नाकारायला हवी

By admin | Updated: January 8, 2017 23:31 IST

लातूर : विषमतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्थाच नाकारली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. प्रतिमा परदेशी यांनी केले.

लातूर : विषमतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्थाच नाकारली पाहिजे. जातीअंत व नवसमाज निर्मितीसाठी पुरोगामी चळवळीला अधिक बळकट केले पाहिजे. यासाठी प्रत्येक जातीतील महिलांशी संवाद ठेवला पाहिजे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेला नाकारून समानतेवर आधारलेली कुटुंब व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय स्त्रीला सन्मान मिळणार नाही, असे प्रतिपादन डॉ. प्रतिमा परदेशी यांनी केले.अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशन समारोपप्रसंगी रविवारी त्या बोलत होत्या. विचारमंचावर प्रा. नूतन माळवी, सतीश जामोदकर, प्राचार्य शिवाजी माडे, हिराचंद बोरकुटे यांची उपस्थिती होती. डॉ. परदेशी म्हणाल्या, महिलांच्या बाबतीत सावित्रीच्या लेकी, जिजाऊंच्या लेकी, अहिल्याबार्इंच्या लेकी असा भेदाभेद करून विभाजन करू नका. सर्व लेकी समान आहेत. जातीच्या उतरंडीवरच फुली मारून चालणार नाही, तर स्त्री दास्यत्वावरही फुली मारली पाहिजे. विषम आणि शोषणावरील समाजाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सत्यशोधकीने पुढे आले पाहिजे. फुलेंची कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीवर आधारित आहे. तर ब्राह्मणी कुटुंब व्यवस्था विषमतेवर आधारित आहे. या व्यवस्थेत स्त्री गुलाम आहे. मानवतेच्या दृष्टीने तिचे हक्क नाकारले जातात. तिला चौकटीत डांबून ठेवले जाते. या कुटुंब व्यवस्थेवर पुरुषांचे वर्चस्व आहे. आम्हाला फुलेंची लोकशाहीवर आधारलेली कुटुंब व्यवस्था महत्त्वाची आहे, असेही त्या म्हणाल्या. (अधिक वृत्त हॅलो / २ वर)