शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: January 21, 2015 23:54 IST

लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी,

लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी, ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण कक्षाकडे अधिग्रहणासाठी दररोज प्रस्ताव येत आहेत. दिवसेंदिवस या प्रस्तावांचा ओघ वाढत आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून २६ गावाम्ांधून ३२ नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावाची मागणी आली आहे़मागणीचे आलेले सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे़ त्यामुळे विंधन विहिरीची मागणीही दिवसेंंदिवस वाढत आहे़ अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील २ विंधन विहिरीचे तसेच थोडगेवाडी १, थोडगा १, हंगरगा १, बाभळदरा २, सय्यदपूर १, गादगेवाडी १, सोनवणेवाडी १, हंगेवाडी १, चाटेवाडी १ प्रस्ताव आले आहेत़ चाकूर तालुक्यातील जानवळ येथील २, अंबुलगा १, ब्रम्हवाडी १ विंधन विहिरीच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे़ औसा तालुक्यातील मनोहर तांडा येथील १, लोहारा सिंदाळा १, उंबडगा (बु.) २, उंबडगा (खु.) १, गुबाळ १, गांजनखेडा १, वांगी १, जवळगा पोमादेवी २, बेलकुंड २, माळुंब्रा १, लिंंबाळा (दाऊ) १, मंगरूळ १ असे नव्या विंधन विहिरीच्या मागणी प्रस्ताव आले आहेत़ विंधन विहिरीची मागणी आली आहे़ यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या टंचाई विभागाकडे १३ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले होते़ या १३ विंधन विहरीचे कामे अद्यापही झाले नाहीत़ १३ विंधन विहिरीपैकी केवळ ८ विंधन विहीरीचे काम पूर्ण झाले आहेत़ अद्यापही ५ विंधन विहिरीचे काम सुरूही झाले नाही. पहिल्या प्रस्तावातीलच ५ विंधन विहिरीचे काम सुरूच झाले नाहीत़ यात या नव्या प्रस्तावांचे काय होणार, अशी चर्चा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांत चालू होती़ प्रस्ताव दाखल करण्यापासून ते मंजुरी आणि विंधन विहिरी घेण्यासाठी तीन महिने लागत असतील तर पाणी केव्हा मिळणार, असाही प्रश्न आहे. (प्रतिनिधी)