विकास राऊत, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इंधन विहिरी खोदण्याचा धंदा तेजीत असून, भूजलावर मोठ्या प्रमाणात डाका टाकण्याचे काम त्यातून होत आहे. परप्रांतांतील यंत्राद्वारे बोअर घेण्याचा सपाटा सर्वत्र सुरू असून, त्यामुळे जमिनीचे नुकसान होत आहे. शिवाय पाणीपातळी खालावलेली असताना बोअर घेतल्याने भविष्यात भूजल पातळी संपुष्टात येण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ज्या भागातील भूजल पातळी कमी झालेली आहे, त्या भागात बोअर घेण्यास शासनाने मनाई केलेली असतानाही जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्राधिकरणाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने परप्रांतांतून आलेल्या व्यावसायिकांचे फावते आहे. जिल्ह्यात सुमारे ७५० ते ८०० पर्यंत बोअर पाडून देणारी वाहने आहेत. सर्वत्र विनापरवाना बोअर पाडून मराठवाड्यातील ७६ पैकी तब्बल ७२ तालुक्यांतील भूजल पातळीला कमी पावसामुळे फटका बसला आहे. सुमारे ९ हजारांहून अधिक मशिनरी मराठवाड्यात भूजल पातळीवर डाका टाकीत आहेत. जिल्ह्यातील खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, पैठण आणि औरंगाबाद तालुक्यांतील पाणीपातळी घटली आहे.
भूजलावर राजरोसपणे टाकतायत डाका
By admin | Updated: December 18, 2015 00:20 IST