शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

सोन्याचे भाव घसरूनही मागणी कमीच

By admin | Updated: May 24, 2014 02:10 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅममागे तब्बल २ हजार रुपयांनी कमी झाले.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव प्रती १० ग्रॅममागे तब्बल २ हजार रुपयांनी कमी झाले. सोन्याने मागील १० महिन्यांतील नीचांक गाठल्याने बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सराफा बाजारात आजही तुरळकच ग्राहकी दिसून आली. आणखी भाव कमी होतील या आशेने ग्राहकांनी ‘थांबा आणि पाहा’ अशी नीती अवलंबिली असल्याने ज्यांना सोने खरेदी करणे आवश्यक आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसून आले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य किंचित वाढले, तर दुसरीकडे सोने व चांदीच्या किमतीत घट झाली. गुरुवार, १५ मे रोजी औरंगाबादेत सोने ३०,३०० रुपये प्रती १० ग्रॅम विक्री झाले होते. शुक्रवार, १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि सोन्याचे भाव दिवसभरात १३०० रुपयांनी कमी होऊन २९००० रुपये प्रती १० ग्रॅमवर आले. दोन दिवसांपूर्वी चांदीचा भाव ४२ हजार रुपये प्रतिकिलो होता. शुक्रवारी सोन्याबरोबर चांदीचे भाव हजार रुपयांनी कमी होऊन ४१ हजार रुपये प्रतिकिलोवर आले. २१ मे रोजी दिवसभरात ८०० रुपयांनी सोन्याचे भाव कमी होऊन २८,३०० रुपये प्रती १० ग्रॅमपर्यंत खाली आले. यासंदर्भात गिरधरभाई जालनावाला यांनी सांगितले की, मागील आठ दिवसांत सोन्याचे भाव तब्बल २ हजार रुपयांनी उतरले. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव २७ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतील. वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापिका माधुरी घाटगे यांनी सांगितले की, मागील आठवडाभरात हजार ते दीड हजार रुपयांनी सोन्याचे भाव कमी झाले. मात्र, त्या तुलनेत सोने, दागिने खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा दिसून आला नाही. पूर्वी १०० ते २०० रुपयांनी जरी सोन्याचे भाव कमी झाले तरीही ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत असे. जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी जुगलकिशोर वर्मा म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून ग्राहक फक्त फोनवर सोन्याच्या किमतीबद्दल चौकशी करीत आहेत. काही जण दुकानात येऊन दागिने पाहून जात आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे तेच सोने व दागिने खरेदी करीत आहेत. सोन्याच्या वाढत्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावरील वाढती तूट लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने जुलै २०१३ मध्ये सोने आयातीवर अनेक निर्बंध लादले होते. केंद्र सरकारनेही वेळोवेळी मौल्यवान धातूवर आयात शुल्कीही वधारते ठेवले होते. तसेच खुद्द यूपीएच्या अर्थमंत्र्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका, असे आवाहनही केले होते.