शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

टंचाई नव्हे, जिल्ह्यात दुष्काळच जाहीर करा

By admin | Updated: August 15, 2014 01:34 IST

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. या सभेत दुष्काळी परिस्थितीवरच चर्चा करून सदस्यांनी काही सूचनाही केल्या.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २.३० वाजता सभा सुरू झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शिक्षण व आरोग्य सभापती वर्षा देशमुख, महिला व बालकल्याण सभापती शीतल गव्हाड, कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे, समाजकल्याण सभापती रुख्मीणीताई राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विरोधी सदस्यांनी सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांची यादी करा, अशी मागणी केली. प्रत्येकवेळी काही अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असा आरोपही करण्यात आला. एवढेच नव्हे तर विरोधी सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सतीश टोपे, राजेश राठोड यांनी केली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावर टंचाईग्रस्त भागात ३९ टँकर सुरू असून १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता तांगडे यांनी दिली. उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात केलेल्या नियोजनाअंतर्गत १ कोटी १६ लाख रुपये खर्च झाला. मात्र दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण झाले का, दुष्काळ निवारणासाठीचा प्लॅन तयार आहे का, असे विविध प्रश्न विरोधी सदस्यांनी केले. भूजल अधिकारी एकच आहे, असे सांगताच सत्ताधारी व विरोधी सदस्य संतप्त झाले. अनिरूद्ध खोतकर म्हणाले, भूजल अधिकारी एकच आहे, मग आम्ही सर्वे करायचा का? आणखी भूजल अधिकाऱ्यांची गरज असल्याचे शासनाकडे लेखी कळविले का? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)