शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

टंचाई नव्हे, जिल्ह्यात दुष्काळच जाहीर करा

By admin | Updated: August 15, 2014 01:34 IST

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. या सभेत दुष्काळी परिस्थितीवरच चर्चा करून सदस्यांनी काही सूचनाही केल्या.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २.३० वाजता सभा सुरू झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शिक्षण व आरोग्य सभापती वर्षा देशमुख, महिला व बालकल्याण सभापती शीतल गव्हाड, कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे, समाजकल्याण सभापती रुख्मीणीताई राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विरोधी सदस्यांनी सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांची यादी करा, अशी मागणी केली. प्रत्येकवेळी काही अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असा आरोपही करण्यात आला. एवढेच नव्हे तर विरोधी सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सतीश टोपे, राजेश राठोड यांनी केली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावर टंचाईग्रस्त भागात ३९ टँकर सुरू असून १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता तांगडे यांनी दिली. उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात केलेल्या नियोजनाअंतर्गत १ कोटी १६ लाख रुपये खर्च झाला. मात्र दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण झाले का, दुष्काळ निवारणासाठीचा प्लॅन तयार आहे का, असे विविध प्रश्न विरोधी सदस्यांनी केले. भूजल अधिकारी एकच आहे, असे सांगताच सत्ताधारी व विरोधी सदस्य संतप्त झाले. अनिरूद्ध खोतकर म्हणाले, भूजल अधिकारी एकच आहे, मग आम्ही सर्वे करायचा का? आणखी भूजल अधिकाऱ्यांची गरज असल्याचे शासनाकडे लेखी कळविले का? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)