शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना उतरती कळा

By admin | Updated: August 14, 2014 02:08 IST

विजय चोरडिया, जिंतूर महिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे.

विजय चोरडिया, जिंतूरमहिलांना स्वयंपूर्ण करणाऱ्या बचत गट चळवळीला जिंतूर तालुक्यात अखेरची घरघर लागली आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील ५०० पेक्षा जास्त गट बंद पडले आहेत. याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागात ६७५ बचत गट आहेत. त्यापैकी ११४ गट अनियमित असून १९० गट बंद पडले आहेत. हा आकडा शासकीय असला तरी बंद पडलेल्या गटांची संख्या ३५० च्या घरात आहे. २७१ चालू गटापैकी १७० गटांना विविध बँकांनी वित्त पुरवठा केला आहे. १७० पैकी १५० बचत गट सक्षम असून वेगवेगळ्या उपक्रमातून आपली आर्थिक उन्नती ते करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने मागील चार ते पाच वर्षापासून बचत गट चळवळ जोमाने सुरू आहे. परंतु मागील दोन वर्षांपासून या चळवळीला फारसे वित्तीय सहाय्य बँकांकडून मिळत नाही. म्हणूनच की, काय? अनेक बचत गट नावालाच उरले आहेत. शहरी भागामध्ये १११ बचत गटांची नगरपालिकेकडे नोंदणी आहे. त्यापैकी ७५ बचत गट चालू असून साधारणत: ३० ते ३५ बचत गट बंद अवस्थेत आहेत. सध्या कार्यरत असणाऱ्या बचत गटांपैकी ५२ बचत गटांना वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठा केला आहे. यापैकी २० ते २५ बचत गट सक्षमपणे शहरी भागामध्ये कार्यरत आहेत. शहरी भागामध्येही बचत गटांची संख्या फुगलेली दिसत आहे. प्रत्यक्षात बचत गटाला ज्या पद्धतीने चालना मिळायला हवी तशी मिळत नाही. परिणामी अनेक बचत गट बंद अवस्थेत आहेत. बचत गट चळवळ सक्षमपणे चालली तर महिलांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होता येईल, यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच बँकांनी सक्षम बचत गटाला विना प्रयास तात्काळ आर्थिक मदत केल्यास महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे वाटते.