शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

मुदतवाढीची घोषणा; लेखी आदेशच नाहीत !

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात नाफेडच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात रविवारी सायंकाळपर्यंत कुठलेही आदेश आले नसल्याने सोमवारपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा जास्त तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारपेठेत तुरीची आवक वाढली. परिणामी, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून ९ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने महिन्यातून किमान तीन-चार वेळा टाळे लागत होते. सुरुवातीस १५ मार्चपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहणार होते. परंतु, होणारी आवक पाहता त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा असल्याने तुरीचा मापतोल करण्यास चार-चार दिवसांचा विलंब लागत होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. गुरुवारी अचानकपणे १५ एप्रिलपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्याचे नाफेडने आदेश दिले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, राज्य शासनाकडून आठवडाभर मुदतवाढीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात लेखी आदेश नाफेडच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत. याउलट खरेदी केंद्रावर असलेल्या सर्व तुरीचे मापतोल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ज्या केंद्रांवर मापतोल झाला आहे, तेथील केंद्र बंद झाले आहे. (प्रतिनिधी)