शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

मुदतवाढीची घोषणा; लेखी आदेशच नाहीत !

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.

लातूर : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तूर हमीभाव खरेदी केंद्रांना आठवडाभराची मुदतवाढ दिल्याची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्षात नाफेडच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात रविवारी सायंकाळपर्यंत कुठलेही आदेश आले नसल्याने सोमवारपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे मुदतवाढीची घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे.यंदा अपेक्षेपेक्षा जास्त तुरीचे उत्पादन झाल्याने बाजारपेठेत तुरीची आवक वाढली. परिणामी, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाने जिल्ह्यात १५ डिसेंबरपासून ९ हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने महिन्यातून किमान तीन-चार वेळा टाळे लागत होते. सुरुवातीस १५ मार्चपर्यंत हमीभाव खरेदी केंद्र सुरू राहणार होते. परंतु, होणारी आवक पाहता त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र प्रत्यक्षात केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा असल्याने तुरीचा मापतोल करण्यास चार-चार दिवसांचा विलंब लागत होता. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले होते. गुरुवारी अचानकपणे १५ एप्रिलपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्याचे नाफेडने आदेश दिले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान, राज्य शासनाकडून आठवडाभर मुदतवाढीची घोषणा झाली. पण प्रत्यक्षात लेखी आदेश नाफेडच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत. याउलट खरेदी केंद्रावर असलेल्या सर्व तुरीचे मापतोल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे ज्या केंद्रांवर मापतोल झाला आहे, तेथील केंद्र बंद झाले आहे. (प्रतिनिधी)