शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

सुखनाच्या पाण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:05 IST

सुखना मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी कोणताही मनाई आदेश दिलेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याविषयी पाटबंधारे विभागाने निर्णय घ्यावा, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुखना मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी कोणताही मनाई आदेश दिलेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याविषयी पाटबंधारे विभागाने निर्णय घ्यावा, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.गारखेडा येथील सरपंच मनीषा शैलेश चौधरी यांनी खंडपीठात अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फ त खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. जनहित याचिकेत माजी जि. प. सदस्य उदय पवार यांनी अ‍ॅड. शरद नातू यांच्या वतीने खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केला.आॅक्टोबरमध्ये शेतक-यांनी मागणी केली तेव्हा धरणात ५० टक्के साठा होता. शासनाने स्वत:हून वेळीच पाणी सोडण्याची गरज होती. डिसेंबरमध्ये पाणी सोडल्यानंतर कालव्यात काँक्रीट टाकण्यात आले. यासंबंधी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे अर्जात म्हटले आहे.यापूर्वीच्या सुनावणीत धरणात पुरेसा जलसाठा असून, शेतीसाठी पुन्हा एका आवर्तनाची सोय होऊ शकते, असे शपथपत्र जिल्हाधिका-यांनी खंडपीठात सादर केले होते. २५ जानेवारीपर्यंत धरणात ४०० कोटी लिटर पाणी होते. १० गावांनी पिण्याच्या पाण्याची मागणी केल्यास पाणी सोडता येईल व १५ जुलै २०१८ पर्यंत ३४ हजार लोकसंख्येसाठी पिण्याचे पाणी सोडता येऊ शकेल, असे प्रतिपादनही करण्यात आले, तर मंगरूळ, जडगाव, गारखेडा, आपतगाव आणि टोणगाव या पाचच गावांसाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ०.१०९४ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवले आहे. आणखी १० गावांसाठीची मागणी आल्यास ३० जुलै २०१८ पर्यंत पुरेसे पाणी आहे. १० आॅगस्ट २००४ च्या शासन निर्णयानुसार संबंधित ग्रामपंचायतींनी ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा पाणी वाटप समितीकडे मागणी करून, ५० टक्के रक्कम जमा करून शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते, असे निवेदन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले. अ‍ॅड. बी. आर. सुरवसे यांनी पाटबंधारे विभागाची बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील यावलकर यांनी काम पाहिले.