शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सुखनाच्या पाण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:05 IST

सुखना मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी कोणताही मनाई आदेश दिलेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याविषयी पाटबंधारे विभागाने निर्णय घ्यावा, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुखना मध्यम प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी कोणताही मनाई आदेश दिलेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी सोडण्याविषयी पाटबंधारे विभागाने निर्णय घ्यावा, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. याचिकेची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.गारखेडा येथील सरपंच मनीषा शैलेश चौधरी यांनी खंडपीठात अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फ त खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. जनहित याचिकेत माजी जि. प. सदस्य उदय पवार यांनी अ‍ॅड. शरद नातू यांच्या वतीने खंडपीठात हस्तक्षेप अर्ज दाखल केला.आॅक्टोबरमध्ये शेतक-यांनी मागणी केली तेव्हा धरणात ५० टक्के साठा होता. शासनाने स्वत:हून वेळीच पाणी सोडण्याची गरज होती. डिसेंबरमध्ये पाणी सोडल्यानंतर कालव्यात काँक्रीट टाकण्यात आले. यासंबंधी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे अर्जात म्हटले आहे.यापूर्वीच्या सुनावणीत धरणात पुरेसा जलसाठा असून, शेतीसाठी पुन्हा एका आवर्तनाची सोय होऊ शकते, असे शपथपत्र जिल्हाधिका-यांनी खंडपीठात सादर केले होते. २५ जानेवारीपर्यंत धरणात ४०० कोटी लिटर पाणी होते. १० गावांनी पिण्याच्या पाण्याची मागणी केल्यास पाणी सोडता येईल व १५ जुलै २०१८ पर्यंत ३४ हजार लोकसंख्येसाठी पिण्याचे पाणी सोडता येऊ शकेल, असे प्रतिपादनही करण्यात आले, तर मंगरूळ, जडगाव, गारखेडा, आपतगाव आणि टोणगाव या पाचच गावांसाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ०.१०९४ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवले आहे. आणखी १० गावांसाठीची मागणी आल्यास ३० जुलै २०१८ पर्यंत पुरेसे पाणी आहे. १० आॅगस्ट २००४ च्या शासन निर्णयानुसार संबंधित ग्रामपंचायतींनी ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा पाणी वाटप समितीकडे मागणी करून, ५० टक्के रक्कम जमा करून शासनाकडून मंजुरी घ्यावी लागते, असे निवेदन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले. अ‍ॅड. बी. आर. सुरवसे यांनी पाटबंधारे विभागाची बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील यावलकर यांनी काम पाहिले.