शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

‘स्मार्ट’ जागेचा निर्णय दोन दिवसांत

By admin | Updated: December 1, 2015 00:30 IST

औरंगाबाद : अंतिम मुदत संपली तरी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा पेच कायम आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की,

औरंगाबाद : अंतिम मुदत संपली तरी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा पेच कायम आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की, चिकलठाणा भागाची हे अजूनही निश्चित झालेले नाही. म्हणून मनपाने राज्य सरकारकडे पाच दिवसांची वाढीव मुदत मागून घेतली आहे. आता जागेविषयीचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे सोमवारी मनपात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरले. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता जहांगीर खान, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त आयुब खान, रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. नाईकवाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळकर, नगररचना विभागाचे ए.बी. देशमुख आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा विषय उपस्थित झाला. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत सोमवारी संपली; परंतु तरीही मनपाचा प्रस्ताव सादर झाला नाही. याविषयी महापौरांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडे विचारणा केली. त्यावर सिकंदर अली यांनी स्मार्ट सिटी चिकलठाणा भागातच व्हावी यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही प्रयत्नशील आहेत. बागडे यांनी सोमवारी सायंकाळी मनपातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याविषयी सूचना दिल्या. डीएमआयसीला लागून असल्यामुळे या भागातच स्मार्ट सिटी विकसित करणे योग्य राहील, असे बागडे यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा ओढा चिकलठाणा भागाकडे असला तरी पालिका प्रशासन मात्र नक्षत्रवाडीच्या बाजूने आहे. नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. तसेच ५५० एकरपैकी २७० एकर जागा ही शासनाच्या मालकीची आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात किमान २५० एकर जमीन असणे आवश्यक आहे. तेवढी जमीन या ठिकाणी सहज मिळेल, असे प्रशासनाचे मत आहे.