शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’ जागेचा निर्णय दोन दिवसांत

By admin | Updated: December 1, 2015 00:30 IST

औरंगाबाद : अंतिम मुदत संपली तरी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा पेच कायम आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की,

औरंगाबाद : अंतिम मुदत संपली तरी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प अहवालाचा पेच कायम आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की, चिकलठाणा भागाची हे अजूनही निश्चित झालेले नाही. म्हणून मनपाने राज्य सरकारकडे पाच दिवसांची वाढीव मुदत मागून घेतली आहे. आता जागेविषयीचा निर्णय दोन दिवसांत घेण्याचे सोमवारी मनपात झालेल्या संयुक्त बैठकीत ठरले. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर प्रमोद राठोड, सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेता जहांगीर खान, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त आयुब खान, रवींद्र निकम, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. नाईकवाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळकर, नगररचना विभागाचे ए.बी. देशमुख आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाचा विषय उपस्थित झाला. राज्य सरकारकडे प्रकल्प अहवाल सादर करण्याची मुदत सोमवारी संपली; परंतु तरीही मनपाचा प्रस्ताव सादर झाला नाही. याविषयी महापौरांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडे विचारणा केली. त्यावर सिकंदर अली यांनी स्मार्ट सिटी चिकलठाणा भागातच व्हावी यासाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेही प्रयत्नशील आहेत. बागडे यांनी सोमवारी सायंकाळी मनपातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याविषयी सूचना दिल्या. डीएमआयसीला लागून असल्यामुळे या भागातच स्मार्ट सिटी विकसित करणे योग्य राहील, असे बागडे यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा ओढा चिकलठाणा भागाकडे असला तरी पालिका प्रशासन मात्र नक्षत्रवाडीच्या बाजूने आहे. नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. तसेच ५५० एकरपैकी २७० एकर जागा ही शासनाच्या मालकीची आहे. ग्रीन फिल्ड प्रकारात किमान २५० एकर जमीन असणे आवश्यक आहे. तेवढी जमीन या ठिकाणी सहज मिळेल, असे प्रशासनाचे मत आहे.