शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

समांतर जलवाहिनीचा निर्णय २० जुलैनंतर

By admin | Updated: July 10, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेली ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी योजना तीन वर्षांपासून रखडली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने शहरासाठी तयार केलेली ७९२ कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी योजना तीन वर्षांपासून रखडली आहे. त्या जलवाहिनीचे काम केव्हा सुरू होणार, २०० कोटींनी योजना महागल्यामुळे ती रक्कम कोण देणार, यावर २० ते २४ जुलैदरम्यान मनपा आणि औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या संचालकांची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी पाणीपुरवठा विभागाचे अभियंते तांत्रिक मुद्यांसह योजनेच्या वाढीव रकमेबाबत कंपनीशी चर्चा करतील. सप्टेंबर २०११ ते मे २०१४ या काळात वाढलेल्या जिल्हा दरसूचीप्रमाणे योजनेचा खर्च सुमारे २०० कोटी रुपयांनी वाढला आहे. हा खर्च कुणाच्या हलगर्जीपणामुळे वाढला यावरून आगामी काळात मनपा व कंपनीत बैठकांचे सत्र होणार आहे. आयुक्त म्हणाले...1३ आठवड्यांत चर्चा होईल. २० ते २४ जुलैदरम्यान समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदार कंपनीसोबत बैठक होईल. शासनाकडे कोणतीही परवानगी शिल्लक नाही. आता शासन म्हणते की, समांतरच्या बाबतीत आमच्याकडे येऊ नका, असे आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले. भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन १६ जुलैनंतर 2महापालिकेने भूमिगत गटार योजनेच्या ४६४ कोटी रुपयांच्या कामाची वर्क आॅर्डर (कार्यादेश) १ जुलै रोजी दिली. ९ कोटी ४० लाख रुपयांची एफएसडी (फिक्स स्कीम डिपॉझिट) कंत्राटदाराने भरली आहे. १६ जुलैनंतर त्या योजनेचे भूमिपूजन होईल, अशी शक्यता आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी वर्तविली. कंत्राटदार महिनाभर शहरातील सर्व ड्रेनेजव्यवस्थेची पाहणी करील. खिल्लारी इन्फ्रा प्रा.लि. व घारपुरे इंजि. अँड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीने भुयारी गटार योजनेचे काम ४६४ कोटी रुपयांत घेतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. २०० कोटींच्या पर्यायानंतर हस्तांतरण 3योजनेच्या कामाला उशीर का झाला? असा कंपनीचा प्रश्न आहे. २० जुलैनंतर मनपा व एसीडब्ल्यूयूसीएलच्या प्रतिनिधीत बैठका होतील. कागदपत्रांची पूर्तता होईल. योजनेचे काम हस्तांतरण करण्यासाठी २ महिने लागतील. योजना २०० कोटींनी महागली आहे, ती रक्कम कुठून आणायची याचा निकाल लागणे महत्त्वाचे आहे. कर्ज काढण्याची व नागरिकांवर बोजा टाकण्याची मनपाची तयारी नाही, असे आयुक्तांनी मागेच स्पष्ट केले आहे. २०० कोटींचा पर्याय निघत नाही तोवर एसीडब्ल्यूयूसीएलकडे समांतरचे काम हस्तांतरित होणार नाही.