शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक

By admin | Updated: January 16, 2017 00:55 IST

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

लातूर : काळ्या पैशाला धक्का दिला पाहिजे, अशी चर्चा दर चार वर्षांनी केली जायची. पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपत्कालीन गैरसोय होईल, पण दीर्घकालीन उपयुक्त आहे, असे मत अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे रविवारी व्यक्त केले. श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने एसएमआर स्वीमिंग पूल येथे ‘विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. मंचावर संस्थेचे मार्गदर्शक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था वेगवान होती. विकासाचा दर ७.५ टक्के होता. याचा अर्थ सर्वकाही अलबेल आहे, असा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. ज्या प्रमाणे रोजगार निर्मिती व्हायला हवी होती, ती झाली नाही. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गैरसोयींबाबत चर्चा झाली. मात्र दीर्घकालीन उपयुक्ततेबद्दल बोलले जात नाही. गैरसोयीचा गैरसमज वाढवून सांगितला. पण उपयुक्तता सांगितली नाही, अशी खंतही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली. या निर्णयामागे बनावट नोटा व काळ्या पैशाला दणका देणे हा हेतू आहे. बनावट नोटांचा उपयोग करून दहशतवाद्यांनी आतापर्यंत ३५ हजार भारतीयांचा बळी घेतला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार बळींची संख्या अत्यंत नगण्य आहे, म्हणून तुम्ही समर्थन करणार का? असा सवालही खा.डॉ. जाधव यांनी उपस्थित केला. सूत्रसंचालन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले, तर संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी आभार मानले.