शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक

By admin | Updated: January 16, 2017 00:55 IST

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

लातूर : काळ्या पैशाला धक्का दिला पाहिजे, अशी चर्चा दर चार वर्षांनी केली जायची. पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपत्कालीन गैरसोय होईल, पण दीर्घकालीन उपयुक्त आहे, असे मत अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे रविवारी व्यक्त केले. श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने एसएमआर स्वीमिंग पूल येथे ‘विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. मंचावर संस्थेचे मार्गदर्शक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था वेगवान होती. विकासाचा दर ७.५ टक्के होता. याचा अर्थ सर्वकाही अलबेल आहे, असा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. ज्या प्रमाणे रोजगार निर्मिती व्हायला हवी होती, ती झाली नाही. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गैरसोयींबाबत चर्चा झाली. मात्र दीर्घकालीन उपयुक्ततेबद्दल बोलले जात नाही. गैरसोयीचा गैरसमज वाढवून सांगितला. पण उपयुक्तता सांगितली नाही, अशी खंतही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली. या निर्णयामागे बनावट नोटा व काळ्या पैशाला दणका देणे हा हेतू आहे. बनावट नोटांचा उपयोग करून दहशतवाद्यांनी आतापर्यंत ३५ हजार भारतीयांचा बळी घेतला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार बळींची संख्या अत्यंत नगण्य आहे, म्हणून तुम्ही समर्थन करणार का? असा सवालही खा.डॉ. जाधव यांनी उपस्थित केला. सूत्रसंचालन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले, तर संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी आभार मानले.