शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

महावितरणमध्ये विकेंद्रीकरणाचे वारे

By admin | Updated: June 20, 2016 00:58 IST

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीत विकेंद्रीकरणाचे वारे वाहू लागले आहे.

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीत विकेंद्रीकरणाचे वारे वाहू लागले आहे. कामात गतिमानता आणण्यासाठी लवकरच राज्यात औरंगाबादसह चार ठिकाणी प्रादेशिक कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. ही कार्यालये १५ आॅगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.महावितरण कंपनीचा संपूर्ण कारभार मुंबईतील मुख्यालयातून चालतो. जिल्हास्तरावर कंपनीची मंडळ, परिमंडळ कार्यालये आहेत. तरीही सर्व अधिकार मुख्यालयाकडेच केंद्रित झालेले आहेत. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवावे लागतात. परिणामी मुंबईतील कार्यालयातून गतिमान पद्धतीने कामकाज करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकेंद्रीकरणाचा प्रयत्न चालविला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादेतील वीज कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात त्यांनी स्वत:च तशी माहितीही दिली होती.मात्र, आता या हालचालींना वेग आला असल्याची माहिती आहे. महावितरण कंपनीत व्यवस्थापकीय संचालक हे प्रमुख पद आहे. या पदावरील वरिष्ठ दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांकडून महावितरणचा कारभार हाकला जातो. परंतु आता औरंगाबादसह, नागपूर, पुणे आणि मुंबई अशा चार ठिकाणी प्रादेशिक कार्यालये उघडण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक हे प्रमुख पद असणार आहे. या पदावर ज्युनिअर आयएएस अधिकारी किंवा सीएची नियुक्ती केली जाणार आहे. या विकेंद्रीकरणानंतर बदल्यांसह सर्व प्रकारचे अधिकार प्रादेशिक कार्यालयाकडे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे कामात गतिमानता येईल तसेच वसुली, वीज गळती यासारख्या विषयांवर अधिक बारकाईने लक्ष दिले जाऊ शकेल. सध्या विकेंद्रीकरणाच्या हालचालींना गती आली असून, येत्या १५ आॅगस्टपर्यंतच हे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.