शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

मेव्हण्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: May 10, 2016 01:02 IST

वाळूज महानगर : आठ दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीत कौटुंबिक कारणावरून मेव्हणा व त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला

वाळूज महानगर : आठ दिवसांपूर्वी वाळूज औद्योगिक वसाहतीत कौटुंबिक कारणावरून मेव्हणा व त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गणेश आझाद दुगलज (२५, रा. रेणुकानगर, रांजणगाव शेणपुंजी) या तरुणाचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी रात्री अखेर मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस आरोपींना अभय देत असल्याचा आरोप करीत घाटीत चांगलाच गोंधळ घातला. प्रेत ताब्यात घेण्यात नकार दिला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालीत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी दुपारी नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, रांजणगाव शेणपुंजी येथील गणेश दुगलज याचे कुटुंब व पंढरपुरातील चंडालिया या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरूआहे. विशेष म्हणजे दुगलज कुटुंबातील दोन मुलींचे लग्न चंडालिया कुटुंबियात करण्यात आले आहे आणि या दोन्ही मुलींना चंडालिया कुटुंब नीट वागवत नव्हते. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांसोबत वारंवार खटके उडत होते. हेच या दोन्ही कुटुंबातील वादाचे मूळ होते.बहिणीला नीट वागवीत नाही म्हणून मयत गणेशचा भाऊ आतिश दुगलज याने चंडालिया कुटुंबियाला फोन करून ‘तुम्ही माझ्या बहिणींचे वाटोळे केले. आता तरी नीट वागा, त्यांना नीट वागवा’ असे बजावले होते. आतिशच्या या धमकीवजा सूचनेमुळे संतापलेला मेव्हणा नरेश चंडालिया याने त्याचे नातेवाईक सुनील चंडालिया, (पान २ वर)गणेश दुगलज याची मोठी बहीण आरती हिचा विवाह पंढरपुरातील नरेश चंडालियासोबत तर धाकटी सोनमचा विवाह सुनील चंडालिया याच्याशी झालेला आहे. या दोन्ही बहिणींचा सासरकडील मंडळी छळ करीत असल्यामुळे दुगलज कुटुंबियाचा चंडालिया कुटुंबाबरोबर वाद सुरूआहे. ४या दोन्ही बहिणींनी त्यांच्या सासरकडील मंडळी सतत शारीरिक, मानसिक छळ करीत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. दीड वर्षापूर्वी याच कारणावरून आतिश दुगलज, गणेश दुगलज यांनी आपला मेव्हणा सुनील चंडालिया याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ४या प्रकरणी सुनील चंडालिया यांच्या तक्रारीवरून दुगलज कुटुंबाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेच्या आदल्या दिवशी १ मे रोजी दुगलज कुटुंबियांनी पंढरपुरात जाऊन चंडालिया कुटुंबाशी वाद घातला होता.