शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

गंगापूर तालुक्यात औद्योगिक परिसरात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे ...

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने व तोकड्या उपाययोजनामुळे तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा सहा हजार एकशे पाचपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत ९१ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूचे प्रमाण हे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत म्हणजे रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी परिसरात आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मागील आठवड्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्या लाटेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांत ६४ जणांचा, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या तीन महिन्यांत २७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूची सरासरी प्रतिमहा तीनने वाढलेली असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी २.३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये औद्योगिक परिसरातील रांजणगाव, वाळूज व जोगेश्वरी या गावांतील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल गंगापूर व लासूरचाचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या गंगापूर, लासूर, रांजणगाव, वाळूज व भेंडाळापैकी गंगापुरात रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला असला तरी नागरिकांद्वारे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाळूज- रांजणगावात औद्योगिक वसाहतीत कारखाने सुरू असल्याने येथेही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच गावांपैकी केवळ भेंडाळ्यात प्रशासनाने कन्टेंंमेंट झोन जाहीर केल्याने या गावात दोन दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.

चौकट -

प्रशासकीय यंत्रणा अपयशी

सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी, या काळात इतर आस्थापनेही खुलेआम सुरू राहतात. दुपारनंतरही अनेक दुकाने अर्ध शटरवर सुरू राहत आहेत. याशिवाय बाधित रुग्णांच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अपुरी कर्मचारी संख्या व उपाययोजनांच्या थातूरमातूर अंमलबजावणीमुळे रुग्णवाढीला ‘ब्रेक’ लावण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते.