शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर तालुक्यात औद्योगिक परिसरात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे ...

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने व तोकड्या उपाययोजनामुळे तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा सहा हजार एकशे पाचपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत ९१ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूचे प्रमाण हे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत म्हणजे रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी परिसरात आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मागील आठवड्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्या लाटेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांत ६४ जणांचा, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या तीन महिन्यांत २७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूची सरासरी प्रतिमहा तीनने वाढलेली असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी २.३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये औद्योगिक परिसरातील रांजणगाव, वाळूज व जोगेश्वरी या गावांतील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल गंगापूर व लासूरचाचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या गंगापूर, लासूर, रांजणगाव, वाळूज व भेंडाळापैकी गंगापुरात रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला असला तरी नागरिकांद्वारे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाळूज- रांजणगावात औद्योगिक वसाहतीत कारखाने सुरू असल्याने येथेही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच गावांपैकी केवळ भेंडाळ्यात प्रशासनाने कन्टेंंमेंट झोन जाहीर केल्याने या गावात दोन दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.

चौकट -

प्रशासकीय यंत्रणा अपयशी

सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी, या काळात इतर आस्थापनेही खुलेआम सुरू राहतात. दुपारनंतरही अनेक दुकाने अर्ध शटरवर सुरू राहत आहेत. याशिवाय बाधित रुग्णांच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अपुरी कर्मचारी संख्या व उपाययोजनांच्या थातूरमातूर अंमलबजावणीमुळे रुग्णवाढीला ‘ब्रेक’ लावण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते.