शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

गंगापूर तालुक्यात औद्योगिक परिसरात कोरोनाने मृत्यूचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:04 IST

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे ...

गंगापूर : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव वेगाने होत असून, दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. यामध्ये ग्रामीण भागात रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने व तोकड्या उपाययोजनामुळे तालुक्यात एकूण बाधितांचा आकडा सहा हजार एकशे पाचपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत ९१ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूचे प्रमाण हे तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत म्हणजे रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी परिसरात आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचा शिरकाव झाला होता. मागील आठवड्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पहिल्या लाटेत एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांत ६४ जणांचा, तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या तीन महिन्यांत २७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूची सरासरी प्रतिमहा तीनने वाढलेली असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी २.३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये औद्योगिक परिसरातील रांजणगाव, वाळूज व जोगेश्वरी या गावांतील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्याखालोखाल गंगापूर व लासूरचाचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या गंगापूर, लासूर, रांजणगाव, वाळूज व भेंडाळापैकी गंगापुरात रुग्णवाढीचा वेग काही प्रमाणात कमी झाला असला तरी नागरिकांद्वारे नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. वाळूज- रांजणगावात औद्योगिक वसाहतीत कारखाने सुरू असल्याने येथेही नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच गावांपैकी केवळ भेंडाळ्यात प्रशासनाने कन्टेंंमेंट झोन जाहीर केल्याने या गावात दोन दिवसांत एकही रुग्ण आढळला नाही.

चौकट -

प्रशासकीय यंत्रणा अपयशी

सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असली तरी, या काळात इतर आस्थापनेही खुलेआम सुरू राहतात. दुपारनंतरही अनेक दुकाने अर्ध शटरवर सुरू राहत आहेत. याशिवाय बाधित रुग्णांच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. अपुरी कर्मचारी संख्या व उपाययोजनांच्या थातूरमातूर अंमलबजावणीमुळे रुग्णवाढीला ‘ब्रेक’ लावण्यात प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसून येते.