शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अन्न पाण्याविना बिबट्याचा मृत्यू, सिरसाळ्याच्या डोंगरात आढळले मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:10 IST

अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या  बिबट्याचा  तडफडून मृत्यू झाला

सिल्लोड : अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला.. ही घटना सिल्लोड तालुक्यातील सिरसाळ्याच्या डोंगरात घडली तब्बल पांच दिवस बिबट्याचे प्रेत डोंगरात पडून होते.. एका गुराख्याने वनविभागास माहिती दिल्याने गुरुवारी संध्याकाळी ही घटना समोर आली. रात्री डोंगरात वनकर्मचाऱ्यानी पहारा देऊन  शुक्रवारी सकाळी त्याचे जागेवर शवविच्छेदन करून अंतिम संस्कार केले. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिरसाळा गावापासून 2 किलिमिटर अंतरावर असलेल्या  खोल दरीत या बिबट्याचे प्रेत एका गुरख्याला गुरुवारी दिसले त्या नंतर त्याने सोयगाव वन विभागास माहिती दिली. पण तेथील काही कर्मचारी जळगाव,तर काही औरंगाबाद येथे गेले असल्याने याची माहिती गुरुवारी लपविण्यात आली.  सिल्लोड चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर दहिवाल, अजिंठ्याचे मागधरे, सोयगावचे शिवाजी काळे, वनपाल, वनरक्षक यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्या नंतर शवविच्छेदन करून बिबट्याचे अंतिम संस्कार करण्यात आले.

शिरसाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येत असले तरी याला वनविभाग सोयगाव येते... सर्व गैर सोईनी नटलेल्ल्या या सोयगावात अधिकारी कर्मचारी औरंगाबाद,जळगाव  येथून अपडाऊन करतात... जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही..सर्व पाणवठे कोरडे पडले आहे.. कागदावर त्या पांनवठ्यात पाणी सोडल्या जाते... डोंगरात वृक्ष तोड वाढली आहे. मानवी हस्तक्षेप वाढला आहे.6 दिवसांपूर्वी बिबट्या डोंगरात मरून पडलेला वन कर्मचाऱ्याना दिसला नाही.. याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. यामुळे वनविभागाचे  जंगलात किती लक्ष आहे हे दिसून येते.कर्मचाऱ्यानी डोंगरात पेट्रोलिंग केली असती तर सहा दिवसांपूर्वी ही घटना उघड झाली असती.अन्न पाण्यामुळेच मृत्यू....ही तर भूक बळीच आहे... सहा दिवसात बिबट्याचे प्रेत कुजले होते.. त्याची चामडी गळून पडत होती. त्याच्या पोटात अन्ना चा एक कण नव्हता.. पाणी नव्हते.. यामुळे त्याचा मृत्यू  अन्न पाण्यामुळेच झाला आहे.-डॉ. धनंजय महाजन पशुवैद्यकीय अधिकारी घाटनांद्रा.

मेल्यानंतर ही हेळसांडजिवंत पणी त्या बिबट्याला डोंगरात अन्न पाणी मिळाळे नाही... त्यासाठी त्याला भटकंती करावी लागली... मेल्यावर सुद्धा 6 दिवस त्याकडे कुणी पाहिले नाही... त्याचे प्रेत अक्षरशा कुजले होते.. यामुळे निसर्ग प्रेमी संताप व्यक्त करीत आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.