शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:23 IST

कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.या घटनेत मरण पावलेल्या विवाहितेचे नाव उषाबाई नामदेव गव्हाणे (रा.बोदवड, ता.सिल्लोड) असे आहे. कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर उषाबाई यांना त्रास होऊ लागला.त्यावेळी दवाखान्यात उपचारासाठी कुणीही नव्हते. त्यामुळे तिच्या पतीने उषाबाईला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. ही घटना आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनाला समजल्यानंतर त्यांनी उषाबाईस बोलावून उपचार सुरु केले. पुन्हा उषाबाईला बुधवारी रात्रीपासून त्रास सुरु झाला.गुरुवारी या महिलेचे टाके आरोग्य केंद्रात काढण्यात आले. त्यानंतर तिला उलट्या झाल्या. त्रास वाढल्याने तिला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच चिचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक संतापले.इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणीडॉक्टर व त्यांच्या कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळेच उषाबाईचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नामदेव गव्हाणे व नातेवाईकांनी केला आहे. ही घटना कळताच सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची गर्दी झाली. या प्रकरणी इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, या मागणीवर नातेवाईक ठाम होते. सत्यता बाहेर यावी म्हणून गुरुवारी मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आला. मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गुन्हा दाखल झाला नाही म्हणून सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.यात डॉक्टर किंवा कर्मचाºयांचा दोष नाही. उषाबाईला अ‍ॅसिडीटी झाली होती. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला असावा, नातेवाईकांनी केलेले आरोप खोटे आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावर खरे काय ते कळेल.-डॉ. एम. एम. चोपडेवैद्यकीय अधिकारी, पानवडोद