शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: July 15, 2017 00:13 IST

सेनगाव/ औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव/ औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. सेनगाव जयपूर येथे १३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शंकर पांडुरंग पायघन (२३) या युवकाचा विजेचा जबर धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या गलथानपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जयपूर येथील शंकर पांडुरंग पायघन (२३) हा युवक गावातील सर्व्हिसिंग सेंटरवर गेला होता. यावेळी नवीन सर्व्हिसिंग मशीनची मित्रासमवेत हाताळणी करीत असताना अचानक पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरून पायघन यांना जबर धक्का लागला. घटनास्थळापासून १० मीटर अंतरावर डीपी असताना तिला फ्यूज नसल्याने वीजप्रवाह बंद करता आला नाही. या दुर्देवी घटनेत पायघन यांचा मृत्यू झाला. त्यांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.दुसऱ्या घटनेत औंढा तालुक्यातील काळापाणीतांडा येथील शेतकरी गेला असता खाली पडलेल्या विजेचा तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. काळापाणी तांडा येथील अनिल नामदेव पवार (२७) हा शेतामध्ये गेला असता पिकामध्ये आलेली शेळी हाकलण्यासाठी तिच्यामागे धावत असताना रात्रीच्या वेळी तुटलेल्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.रोहिदास राठोड व रामदास पवार ही माहिती दिल्याने कुरूंदा पोलिसांत याची नोंद केली आहे. गुरूवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळाचा वीज वितरणीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. जि.प. सदस्या सुमन रमेश जाधव यांनी वीज वितरण कंपनीने सदरील मयतास नुकसान भरपाई करून देण्याची मागणी केली आहे.