शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रिमॅच्युअर डिलिव्हरीमुळे २५८ बाळांचा मृत्यू

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

भालचंद्र येडवे ,लातूर हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़

भालचंद्र येडवे ,लातूरहिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़ परिणामी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाला़ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कागदोपत्री जनजागृती केली जाते़ प्रत्यक्षात ग्रामीण गरोदर मातांना सकस आहार व उपचाराच्या टिप्स मिळत नाहीत़ त्यामुळेच गरोदर मातांची डिलिव्हरी कालावधीपूर्वी झाल्याचे प्रमाण अधिक आहे़ केवळ सकस आहार व योग्य उपचार न मिळाल्यामुळे हे संकट ओढावले आहे़ एकट्या लातूर जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरुन १६, कमी वजनामुळे ३९ बालकांचा मृत्यू झाला आहे़ परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्रा’चा एक प्रकारे फज्जाच उडाला आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात निमोनिया, कमी दिवस व कमी वजन, हृदयास छिद्र, गुदमरणे, मेंदूज्वरसह अन्य विविध कारणांनी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यात एकट्या लातूर तालुक्यात उपरोक्त कारणांन्वये ५० बालमृत्यू झाले आहेत़ त्यात २१ मुले तर २९ मुलींचा समावेश आहे़ बाळांचे वजन कमी असल्या कारणाने मृत्यू झाल्याचा आकडा मोठ्या प्रमाणात आढळतो़ प्रिमॅच्युरीटी व बाळाची वाढ न होणे या दोन प्रकारामुळे आरोग्यावर परिणाम होतो़ गरोदर मातांना ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, रक्त कमी असणे, जंतू प्रसार, सकस आहार, वेळेवर उपचार आदी कारणांमुळे बालमृत्यूच्या संकटाला सामोरे जावे लागते़ आजही ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या प्रबोधनाभावी प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण अधिक आहे़ या सर्व गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबवितात़ मात्र शासकीय रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभागात (एनआयसीयु) योग्य उपचार व सुविधा उपलब्ध न झाल्याने प्रतिदिनी ८ ते १० रुग्ण सेवा न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात़ लातूर जिल्ह्यात पहिल्या आठवड्यातच ८० बाळांना वेगवेगळ्या कारणाने आपला जीव गमवावा लागला़ तर १ ते ५ वर्षातील बाळांच्या मृत्यूचे प्रमाण २५८ च्या घरात आहे़ या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करुन संबंधीतांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सुचविले आहे़ गरोदर मातांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या़