शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

प्रिमॅच्युअर डिलिव्हरीमुळे २५८ बाळांचा मृत्यू

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

भालचंद्र येडवे ,लातूर हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़

भालचंद्र येडवे ,लातूरहिमोग्लोबीनचे प्रमाण कमी, जंतू प्रसार, सकस आहार व उपचाराचा अभाव तसेच रक्तक्षयाच्या आजारामुळे प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढले आहे़ परिणामी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाला़ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कागदोपत्री जनजागृती केली जाते़ प्रत्यक्षात ग्रामीण गरोदर मातांना सकस आहार व उपचाराच्या टिप्स मिळत नाहीत़ त्यामुळेच गरोदर मातांची डिलिव्हरी कालावधीपूर्वी झाल्याचे प्रमाण अधिक आहे़ केवळ सकस आहार व योग्य उपचार न मिळाल्यामुळे हे संकट ओढावले आहे़ एकट्या लातूर जिल्ह्यात आईच्या पोटात गुदमरुन १६, कमी वजनामुळे ३९ बालकांचा मृत्यू झाला आहे़ परिणामी, ‘सुदृढ बालक, सशक्त युवक, संपन्न महाराष्ट्रा’चा एक प्रकारे फज्जाच उडाला आहे़जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात निमोनिया, कमी दिवस व कमी वजन, हृदयास छिद्र, गुदमरणे, मेंदूज्वरसह अन्य विविध कारणांनी वर्षभरात २५८ बाळांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यात एकट्या लातूर तालुक्यात उपरोक्त कारणांन्वये ५० बालमृत्यू झाले आहेत़ त्यात २१ मुले तर २९ मुलींचा समावेश आहे़ बाळांचे वजन कमी असल्या कारणाने मृत्यू झाल्याचा आकडा मोठ्या प्रमाणात आढळतो़ प्रिमॅच्युरीटी व बाळाची वाढ न होणे या दोन प्रकारामुळे आरोग्यावर परिणाम होतो़ गरोदर मातांना ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार, रक्त कमी असणे, जंतू प्रसार, सकस आहार, वेळेवर उपचार आदी कारणांमुळे बालमृत्यूच्या संकटाला सामोरे जावे लागते़ आजही ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या प्रबोधनाभावी प्रिमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण अधिक आहे़ या सर्व गोष्टीवर नियंत्रण करण्यासाठी सरकार राजीव गांधी जीवनदायी योजनेसह अनेक उपक्रम राबवितात़ मात्र शासकीय रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभागात (एनआयसीयु) योग्य उपचार व सुविधा उपलब्ध न झाल्याने प्रतिदिनी ८ ते १० रुग्ण सेवा न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेतात़ लातूर जिल्ह्यात पहिल्या आठवड्यातच ८० बाळांना वेगवेगळ्या कारणाने आपला जीव गमवावा लागला़ तर १ ते ५ वर्षातील बाळांच्या मृत्यूचे प्रमाण २५८ च्या घरात आहे़ या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करुन संबंधीतांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत सुचविले आहे़ गरोदर मातांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या़