शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या दिवशीही कुलगुरू गेले दौ-यावरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील २० केंद्रांवर शुक्रवारी मतदान झाले. या मतदानासाठी प्रत्येक बाबीवर काळजीपूर्वक नियोजन करावे लागते. मतदानाच्या आदल्या दिवशी ऐनवेळी मतपत्रिका कमी पडल्या. याचा परिणाम उस्मानाबाद, उमरगा, अंबाजोगाई आदी दूरच्या मतदान केंद्रांवर कर्मचाºयांना पोहोचण्यास मध्यरात्रीपेक्षा अधिक कालावधी लागला. याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा निकाल मतदानाच्या दिवशीच जाहीर करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. यात कोणताही निर्णय येऊ शकत होता. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी दिवसभर खंडपीठात सुनावणीसाठी हजर होते. यामुळे गुरुवारी मतदान यंत्रणेला सर्व प्रकारच्या सूचना, प्रशिक्षण देण्यात उशीर झाला. यातच बुधवारी सायंकाळी निवडणुका पुढे ढकलल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. यामुळे अवघ्या १२ दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारीपदाचा पदभार स्वीकारलेल्या डॉ. साधना पांडे यासुद्धा निराश झाल्या होत्या. अशा सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठात थांबणे आवश्यक होते.या निवडणुकीचा परिणाम विद्यापीठाच्या आगामी पाच वर्षांवर होणार आहे. असे असताना बुधवारपासून दिल्ली दौºयावर असलेले कुलगुरू गुरुवारी सायंकाळी विद्यापीठात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र कुलगुरूंनी विद्यापीठात येण्याऐवजी मुंबईला जाणे पसंत केल्याचे समजते. मुंबईत सर्व विद्यापीठांचा विकास प्रस्ताव सादर करण्यासाठी ‘रुसा’ची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीला राज्यातील एकाही विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित नव्हते; मात्र औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू त्याठिकाणी उपस्थित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. तुमच्याकडे मतदान असताना तुम्ही बैठकीला कसे? असा प्रश्नही एका अधिकाºयाने कुलगुरूंना विचारल्याचे समजते. याविषयी कुलगुरूंशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.