शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

घाण पाण्यातच उरकावे लागतात दशक्रिया विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST

संजय जाधव पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे ...

संजय जाधव

पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे पाणी अत्यंत घाण झाले असून, नागरिकांना दशक्रिया विधी याच घाण पाण्यात उरकावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, भाविकांसाठी जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याची मागणी समोर आली आहे.

‘मरण काशीत नाही, तर गावच्या वेशीत आले तर मोक्ष मिळतो’ अशी धारणा आहे. याच धारणेतून दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत गोदावरी पात्रात पिंडदान, दशक्रिया विधी व अस्थिविसर्जन करण्याची परंपरा पैठण शहरात पूर्वापार सुरू आहे. नाथ मंदिरा पाठीमागील मोक्षघाटावर दररोज शेकडो दशक्रिया विधी होतात. या विधीसाठी गोदावरीत स्नान करावे लागते. सध्या गोदावरीत पात्रात शहरातील नाल्यातून वाहून आलेले पाणी साचले असून, भाविकांना मात्र याच पाण्यात स्नान करून विधी उरकावा लागत आहे. ऐपतीप्रमाणे काही जण टँकर विकत घेऊन दशक्रिया विधी उरकत आहेत. गरिबांना या घाण पाण्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. श्रद्धेला मोल नसते, असे म्हटले जाते. मात्र, श्रद्धेच्या विश्वासावर गोदावरी पात्रात चक्क गटार गंगेचे पाणी डोक्यावर घेत गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेण्याची वेळ भाविकांवर येत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.

कोट

गोदावरीतून पाणी सोडा

पैठण पात्रात पुढे बंधारा असल्याने, जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी वाया जात नाही. गेल्या ३ महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात न आल्याने गोदावरी पात्रात शहरातील नाल्याचे पाणी जमा झाले आहे. याच पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत असून, धार्मिक भावनेला तडा जात आहे. त्यामुळे लवकर धरणातून पाणी सोडावे.

- गुरू अनंत खरे, मोक्षघाट

कोट

पात्रात घाण पाणी

गोदावरी पात्रात शहरातील सर्व नाल्यांचे घाण पाणी गेल्या चार महिन्यांपासून जमा होत आहे. या पाण्यात अळ्या पडलेल्या आहेत. पाण्यातून बाहेर आल्यानंतर अंगास खाज सुटते. येथे स्नान करणाऱ्या भाविकांची ही खरोखर चेष्टा आहे.

-अनिल लिंबोरे, मच्छीमार.

कोट..

पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करू

शहरात भाविकांना दुर्दैवाने घाण पाण्यात स्नान करावे लागत आहे. ही मोठी खेदाची बाब असून, गोदावरी पात्रात पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.

- दत्ता गोर्डे, राष्ट्रवादी तालुका संपर्कप्रमुख.

एकादशीसाठी पाणी सोडण्याचा जुना निर्णय

भाविकांसाठी दर एकादशीला जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने १९९७ला घेतलेला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.

- ज्ञानेश्वर कापसे, जि. प. सदस्य.

फोटो : गोदावरीच्या घाण पाण्यात दशक्रिया विधीनंतर स्नान करताना भाविक.