शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

घाण पाण्यातच उरकावे लागतात दशक्रिया विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST

संजय जाधव पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे ...

संजय जाधव

पैठण : मोक्षभूमी असलेल्या पैठण शहरातील गोदावरी पात्रात गटारगंगेचे पाणी साचले आहे. कित्येक दिवसांपासून वाहते नसल्याने हे पाणी अत्यंत घाण झाले असून, नागरिकांना दशक्रिया विधी याच घाण पाण्यात उरकावे लागत आहे. यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, भाविकांसाठी जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याची मागणी समोर आली आहे.

‘मरण काशीत नाही, तर गावच्या वेशीत आले तर मोक्ष मिळतो’ अशी धारणा आहे. याच धारणेतून दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठण नगरीत गोदावरी पात्रात पिंडदान, दशक्रिया विधी व अस्थिविसर्जन करण्याची परंपरा पैठण शहरात पूर्वापार सुरू आहे. नाथ मंदिरा पाठीमागील मोक्षघाटावर दररोज शेकडो दशक्रिया विधी होतात. या विधीसाठी गोदावरीत स्नान करावे लागते. सध्या गोदावरीत पात्रात शहरातील नाल्यातून वाहून आलेले पाणी साचले असून, भाविकांना मात्र याच पाण्यात स्नान करून विधी उरकावा लागत आहे. ऐपतीप्रमाणे काही जण टँकर विकत घेऊन दशक्रिया विधी उरकत आहेत. गरिबांना या घाण पाण्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याने, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. श्रद्धेला मोल नसते, असे म्हटले जाते. मात्र, श्रद्धेच्या विश्वासावर गोदावरी पात्रात चक्क गटार गंगेचे पाणी डोक्यावर घेत गोदास्नानाचे पुण्य पदरात पाडून घेण्याची वेळ भाविकांवर येत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे.

कोट

गोदावरीतून पाणी सोडा

पैठण पात्रात पुढे बंधारा असल्याने, जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी वाया जात नाही. गेल्या ३ महिन्यांपासून धरणातून पाणी सोडण्यात न आल्याने गोदावरी पात्रात शहरातील नाल्याचे पाणी जमा झाले आहे. याच पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत असून, धार्मिक भावनेला तडा जात आहे. त्यामुळे लवकर धरणातून पाणी सोडावे.

- गुरू अनंत खरे, मोक्षघाट

कोट

पात्रात घाण पाणी

गोदावरी पात्रात शहरातील सर्व नाल्यांचे घाण पाणी गेल्या चार महिन्यांपासून जमा होत आहे. या पाण्यात अळ्या पडलेल्या आहेत. पाण्यातून बाहेर आल्यानंतर अंगास खाज सुटते. येथे स्नान करणाऱ्या भाविकांची ही खरोखर चेष्टा आहे.

-अनिल लिंबोरे, मच्छीमार.

कोट..

पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करू

शहरात भाविकांना दुर्दैवाने घाण पाण्यात स्नान करावे लागत आहे. ही मोठी खेदाची बाब असून, गोदावरी पात्रात पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.

- दत्ता गोर्डे, राष्ट्रवादी तालुका संपर्कप्रमुख.

एकादशीसाठी पाणी सोडण्याचा जुना निर्णय

भाविकांसाठी दर एकादशीला जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने १९९७ला घेतलेला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करू.

- ज्ञानेश्वर कापसे, जि. प. सदस्य.

फोटो : गोदावरीच्या घाण पाण्यात दशक्रिया विधीनंतर स्नान करताना भाविक.