शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

दारणा, गंगापूर धरणांतून ६५०० क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: August 1, 2016 00:06 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. तर वरच्या भागातील २१ धरणांमध्ये सरासरी ५२ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा झाला आहे. तरीही आतापर्यंत वरच्या भागातून जायकवाडीत पाणी आलेले नाही. उलट पालखेड, मुळा, नांदूर-मधमेश्वर या वरच्या भागातील प्रकल्पाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. अजूनही तीन धरणांचे कालवे सुरूच आहेत; परंतु आता दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वरच्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजेपासून दारणा धरणातूनही अडीच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नंतर तो सायंकाळी ४ वाजता पाच हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. परंतु सायंकाळी पुन्हा तो ३९५० क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने येत आहे. ते दोन दिवसांत जायकवाडीत दाखल होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जायकवाडीत वरच्या भागातून केवळ ७२० क्युसेक्सने पाणी दाखल होत आहे. मात्र, आता दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढणार आहे. दोन दिवसांत ही आवक सुमारे अडीच हजार क्युसेक्सपर्यंत जाऊन जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी आशाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. २० दलघमीची गरजजायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. या धरणाची मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. महिनाभरात जायकवाडीत २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.