शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

दारणा, गंगापूर धरणांतून ६५०० क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Updated: August 1, 2016 00:06 IST

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून २७४० आणि दारणा धरणातून ३९५० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हे पाणी दोन दिवसांत जायकवाडी धरणात दाखल होण्यास सुरुवात होईल. गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरण अजूनही मृतसाठ्यातच आहे. तर वरच्या भागातील २१ धरणांमध्ये सरासरी ५२ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा झाला आहे. तरीही आतापर्यंत वरच्या भागातून जायकवाडीत पाणी आलेले नाही. उलट पालखेड, मुळा, नांदूर-मधमेश्वर या वरच्या भागातील प्रकल्पाच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. अजूनही तीन धरणांचे कालवे सुरूच आहेत; परंतु आता दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वरच्या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून २७४० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी १० वाजेपासून दारणा धरणातूनही अडीच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नंतर तो सायंकाळी ४ वाजता पाच हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. परंतु सायंकाळी पुन्हा तो ३९५० क्युसेक्सपर्यंत खाली आणण्यात आला. हे पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने येत आहे. ते दोन दिवसांत जायकवाडीत दाखल होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जायकवाडीत वरच्या भागातून केवळ ७२० क्युसेक्सने पाणी दाखल होत आहे. मात्र, आता दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याची आवक वाढणार आहे. दोन दिवसांत ही आवक सुमारे अडीच हजार क्युसेक्सपर्यंत जाऊन जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी आशाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. २० दलघमीची गरजजायकवाडी धरणाचा मृतसाठा आतापर्यंत ७१७.७५ दलघमीपर्यंत पोहोचला आहे. या धरणाची मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी आहे. जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २० दलघमीची गरज आहे. महिनाभरात जायकवाडीत २६० दलघमी इतके पाणी आले आहे. मात्र, हे पाणी वरच्या भागातून आलेले नाही, तर ते जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे आलेले आहे.