शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

मनपाच्या खाबूगिरीने अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:21 IST

प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, बेशिस्त वाहतूक आणि त्यात भरीस भर म्हणून महापालिका पथदिवे बंद ठेवते...! शहरातील ५० हजारांपैकी जवळपास २० हजार पथदिवे आजही बंद पडलेले आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील शंभर स्मार्ट शहरांमध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला तब्बल दीड वर्षापूर्वी स्थान मिळाले. स्मार्ट सिटीतील मूलभूत सोयी-सुविधा बघितल्या तर अत्यंत दळभद्री स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, बेशिस्त वाहतूक आणि त्यात भरीस भर म्हणून महापालिका पथदिवे बंद ठेवते...! शहरातील ५० हजारांपैकी जवळपास २० हजार पथदिवे आजही बंद पडलेले आहेत.पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर दर महिन्याला दीड कोटी रुपये (वीज बिल वगळून) खर्च करते. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीसह विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमकडूनही पथदिव्यांच्या कंत्राटदारांना राजकीय आश्रय मिळत आहे.शहरातील कोणत्या प्रमुख रस्त्यांवर सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सर्वाधिक वर्दळ असते. याचा अभ्यास करून महापालिकेने पथदिव्यांची व्यवस्था करायला हवी. पथदिवे लावणे हे मनपाचे कर्तव्य आहे, म्हणून रस्त्यांवर नुसते विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत. त्यात दिवा आहेत किंवा नाहीत याची साधी दखलही महापालिका घेत नाही. महापालिकेत लाइनमनची संख्या खूप कमी आहे, असे निमित्त करून ८ वर्षांपूर्वी पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे खाजगीकरण करण्यात आले. खाजगीकरणात सेनेने अधिक पुढाकार घेतला होता. खाजगीकरण करताच सेनेच्या काही नगरसेवकांनी नातेवाईकांच्या नावावर देखभाल-दुरुस्तीची कामे घेतली. कंत्राटदारांना सकाळी दिवे बंद करणे आणि सायंकाळी चालू करणे एवढेच काम आहे. पाच पैसेही खर्च न करता दरमहिन्याला २२ ते २५ लाख रुपये मिळू लागले. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनीही या कंत्राटी पद्धतीत उडी घेतली. प्रमुख राजकीय पक्षांचे नगरसेवक सध्या पथदिव्यांसाठी नेमलेल्या २२ कंत्राटदारांचे गुरूच बनले आहेत.दिवे असून नसल्यासारखेजालना रोडवर सर्वाधिक वर्दळ असते. या रस्त्यावर काही पथदिवे सुरूही असतात. मात्र, एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकाला तो अजिबात दिसत नाही. एवढा अंधूक प्रकाश या दिव्यांचा असतो. कंत्राटदारांनी लावलेल्या दिव्यांचा प्रकाश किती पडतो याची साधी खातरजामही कोणी करू नये का...? एवढे अडाणी आपले अधिकारी आहेत का...? अधिकारी दर महिन्याला कंत्राटदारांची बिले चुपचाप कशी तयार करून देतात...? विना अडथळा या कंत्राटदारांना बिले मिळतात कशी...?