शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

गणेशोत्सवातही अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:38 IST

वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे गत सहा वर्षांपासून बंद आहेत. वीज बिल भरण्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून परिणामी यंदाच्या गणेशोत्सवातही शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य आहे.गणेशोत्सव काळात तरी शहरातील पथदिवे पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. तात्पुरत्या स्वरुपात जोडणी घेऊन पथदिवे सुरू करावे, अशा सूचनाही काही सदस्यांनी केल्या. मात्र, पालिकेच्या विद्युत विभागाने कुठलेच नियोजन केले नाही.शहरातील विविध रस्त्यांवर पालिकेचे सुमारे १२ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाचा अनेक वर्षांपासून नियमित भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणाची नगरपालिकेकडे मुद्दल व व्याज मिळून दहा कोटींवर थकबाकी आहे. थकबाकीपोटी शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, मामा चौक, कादराबाद, बडीसडक, जिजामाता प्रवेशद्वार या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. जुना जालना भागातील मस्तगड ते गांधीचमन, रेल्वेस्टेशन रोड, कचेरी रोड, उड्डाण पूल या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते आणि मुख्य चौकांमध्ये रात्री अंधार असतो. शहरातील अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी भाविकांचा रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वावर असतो. परंतु, अंधारमय रस्त्यावरून जाताना भाविकांची गैरसोय होत आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.या विषयी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, विसर्जन मिरवणूक रस्ता व विसर्जनाच्या दिवशी मोती तलाव चौपाटीवरील पथदिवे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.