शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

गणेशोत्सवातही अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:38 IST

वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे गत सहा वर्षांपासून बंद आहेत. वीज बिल भरण्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून परिणामी यंदाच्या गणेशोत्सवातही शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य आहे.गणेशोत्सव काळात तरी शहरातील पथदिवे पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. तात्पुरत्या स्वरुपात जोडणी घेऊन पथदिवे सुरू करावे, अशा सूचनाही काही सदस्यांनी केल्या. मात्र, पालिकेच्या विद्युत विभागाने कुठलेच नियोजन केले नाही.शहरातील विविध रस्त्यांवर पालिकेचे सुमारे १२ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाचा अनेक वर्षांपासून नियमित भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणाची नगरपालिकेकडे मुद्दल व व्याज मिळून दहा कोटींवर थकबाकी आहे. थकबाकीपोटी शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, मामा चौक, कादराबाद, बडीसडक, जिजामाता प्रवेशद्वार या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. जुना जालना भागातील मस्तगड ते गांधीचमन, रेल्वेस्टेशन रोड, कचेरी रोड, उड्डाण पूल या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते आणि मुख्य चौकांमध्ये रात्री अंधार असतो. शहरातील अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी भाविकांचा रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वावर असतो. परंतु, अंधारमय रस्त्यावरून जाताना भाविकांची गैरसोय होत आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.या विषयी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, विसर्जन मिरवणूक रस्ता व विसर्जनाच्या दिवशी मोती तलाव चौपाटीवरील पथदिवे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.