शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गणेशोत्सवातही अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:38 IST

वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वीज बिलाच्या थकबाकीपोटी शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे गत सहा वर्षांपासून बंद आहेत. वीज बिल भरण्यासाठी पालिकेने आतापर्यंत केलेले तडजोडीचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून परिणामी यंदाच्या गणेशोत्सवातही शहरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य आहे.गणेशोत्सव काळात तरी शहरातील पथदिवे पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली. तात्पुरत्या स्वरुपात जोडणी घेऊन पथदिवे सुरू करावे, अशा सूचनाही काही सदस्यांनी केल्या. मात्र, पालिकेच्या विद्युत विभागाने कुठलेच नियोजन केले नाही.शहरातील विविध रस्त्यांवर पालिकेचे सुमारे १२ हजार पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या वीज बिलाचा अनेक वर्षांपासून नियमित भरणा करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणाची नगरपालिकेकडे मुद्दल व व्याज मिळून दहा कोटींवर थकबाकी आहे. थकबाकीपोटी शहरातील सर्व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानक, मामा चौक, कादराबाद, बडीसडक, जिजामाता प्रवेशद्वार या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. जुना जालना भागातील मस्तगड ते गांधीचमन, रेल्वेस्टेशन रोड, कचेरी रोड, उड्डाण पूल या भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते आणि मुख्य चौकांमध्ये रात्री अंधार असतो. शहरातील अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेशदर्शनासह देखावे पाहण्यासाठी भाविकांचा रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वावर असतो. परंतु, अंधारमय रस्त्यावरून जाताना भाविकांची गैरसोय होत आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.या विषयी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना विचारले असता, विसर्जन मिरवणूक रस्ता व विसर्जनाच्या दिवशी मोती तलाव चौपाटीवरील पथदिवे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.