शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:55 IST

नांदेड : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या घरी भेट देवून प्रशासनाने कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात २०१२ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकºयांच्या कुटुंबियांची एकाच दिवशी भेटी घेवून त्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्दे६९५ जणांच्या घरी जावून जाणून घेतल्या व्यथा : मोहिमेसाठी ३९१ अधिकारी-कर्मचाºयांची केली होती नियुक्ती

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकºयांना बसला आहे. सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नातील अनियमितता व त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी टोकाचा मार्ग स्वीकारत आत्महत्येला जवळ केले आहे. नांदेड जिल्ह्यातही २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ६९५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यातील ४७४ शेतकºयांना शासनाची मदत मिळाली आहे तर २१३ प्रकरणांमध्ये शासनाची मदत मिळू शकली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या किनवट तालुक्यात आहेत.१३६ शेतकºयांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल हदगाव तालुक्यात ८५, कंधार- ६८, हिमायतनगर-५४, लोहा-५०, भोकर-४२, माहूर-४१, मुखेड-३८, बिलोली-३६, नायगाव-३०, नांदेड-२७, उमरी-२५, अर्धापूर-१९, मुदखेड-१९, धर्माबाद-१४ आणि देगलूर तालुक्यात ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबामध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण होते. मयत शेतकºयांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाच्या किती योजनांचा लाभ मिळाला आहे, याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात १५ नोव्हेंबर रोजी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्या कुटुंबांची काय परिस्थिती आहे, किती कुटुंब स्वबळावर उभी राहिली याची पाहणी करताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रशासन त्यांच्या दारापर्यंत बुधवारी पोहोचले होते. या भेटीत घेतलेल्या माहितीतून भविष्यात काही उपाययोजना करण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील ६९५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यासाठी ३९१ अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये ७८ नोडल आॅफिसरचाही समावेश होता. या मोहिमेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर शासकीय विभागातील अधिकाºयांनीदेखील शेतकरी कुटुंबियास भेट देवून अडचणी जाणून घेणे आवश्यक होते. प्रशासनाकडून बुधवारी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांकडून शासनाची मदत मिळाली काय? आत्महत्या केलेल्या शेतकºयांची परिस्थिती, आत्महत्येचे कारण, कुटुंबियांची माहिती, शेतीची एकूण माहिती, कर्जविषयक माहिती, उत्पन्नाचे स्त्रोत आदी २२ मुद्यांची माहिती एकत्रित केली आहे.