शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

जिल्ह्यातील अडीचशे गावांना टंचाईचे चटके !

By admin | Updated: April 20, 2015 00:31 IST

उस्मानाबाद : टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढू लागल्याने टँकरची संख्याही त्याच गतीने वाढत आहे

उस्मानाबाद : टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढू लागल्याने टँकरची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्हाभरातील सुमारे अडीचशेवर गावांना ७३ टँकर आणि साडेचारशेवर अधिग्रहणाच्या माध्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे.तीन-चार वर्षापासून जिल्ह्यामध्ये सातत्याने कमी पाऊस होत आहे. त्यामुळे जलसाठ्यांमध्ये फारशी वाढ झाली नव्हती. तसेच भू-जल पातळीही अपेक्षित प्रमाणात उंचावली नाही. त्यामुळेच यंदा ऐन हिवाळ्यामध्येच काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येवून ठेपली. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे जलस्त्रोतही झपाट्याने आटू लागले आहेत. परिणामी उपाययोजनांची संख्याही त्याच गतीने वाढू लागली आहे. अनेक गावांमध्ये अधिग्रहणासाठीही जलस्त्रोतांना पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अशा गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या ७३ वर जावून ठेपली आहे. या माध्यमातून जवळपास ५७ गावांची तहान भागविली जात आहे. टँकर भरण्यासाठी सुमारे ६१ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, काही गावांमध्ये सार्वजनिक जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावल्याने ग्रामस्थांना टंचाईलला तोंड द्यावे लागत आहे. अशा गावांसाठी खाजगी जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जवळपास २०० गावांसाठी अधिग्रहणाचा अधार मिळाला आहे. थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ३८८ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहेत. भविष्यात टंचाईचे चटके अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असल्याने प्रशासनाकडून टंचाई निवारणार्थ करावायाच्या उपाययोजना कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार सध्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)