शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

शहरात धोकादायक जलकुंभ; काहींची दुरावस्था

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

संजय कुलकर्णी , जालना सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील

संजय कुलकर्णी , जालनासुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील जलकुंभ अत्यंत जीर्ण झाल्याने तो धोकादायक आहे. तर मुख्य जलशुद्धीकरण केंद्रातील तिन्ही जलकुंभांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे महिनोमहिने या जलकुंभांची स्वच्छताच होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शहरात नवीन भागासाठी घाणेवाडी जलाशय तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. गेल्या चार दिवसांपासून घाणेवाडी जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तेथून पाणी घेणे बंद आहे. शहरवासियांना दररोज ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र साठवण क्षमता कमी असल्याने दररोज ६ ते ७ एमएलडी एवढेच पाणी या जलकुंभांमध्ये साठवले जाते. त्यामुळे शहरात सहा-सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलशुद्धीकरण केंद्र हे निजामकालीन आहे. १९६४ मध्ये या केंद्रात साडेनऊ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. त्यानंतर १९८४ मध्ये याच क्षमतेचा तर २००३-०४ मध्ये २२ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. या तीन जलकुंभांमध्ये नवीन जालन्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची साठवण केली जाते. ५० वर्षे जुन्या झालेल्या जलकुंभाच्या पायऱ्यांभोवती नेहमी आग्यामोहोळ असते. यापूर्वी आग्यामोहळाने काही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर तर एका अभियंत्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. त्यामुळे या पायऱ्यांजवळ कोणी जात नाही. शुद्धीकरण केंद्रातील उर्वरीत दोन जलकुंभांमध्ये कर्मचाऱ्यांना आतमध्ये उतरण्यास पायऱ्याच नाहीत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण या लोखंडी पायऱ्यांना उतरती कळा आलेली असल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.या जलकुंभांमध्ये वर्षानुवर्षे स्वच्छता केली जात नाही. अग्निशामक दलाच्या पंपाद्वारे आत पाणी सोडून स्वच्छता केली जाते, असा दावा तेथील कर्मचाऱ्यांकडून केला जातो. परंतु या जलकुंभांची दुरावस्था लक्षात घेता त्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून झालेली नसावी, असे दिसून येते. जालना जिल्हा निर्मितीपूर्वीचा जलकुंभ येथे आहे. परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या जलकुंभावर जाणे म्हणजे जोखीम घेण्यासारखे आहे. नगरपालिकेने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.