शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शहरात धोकादायक जलकुंभ; काहींची दुरावस्था

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

संजय कुलकर्णी , जालना सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील

संजय कुलकर्णी , जालनासुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील जलकुंभ अत्यंत जीर्ण झाल्याने तो धोकादायक आहे. तर मुख्य जलशुद्धीकरण केंद्रातील तिन्ही जलकुंभांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे महिनोमहिने या जलकुंभांची स्वच्छताच होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शहरात नवीन भागासाठी घाणेवाडी जलाशय तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. गेल्या चार दिवसांपासून घाणेवाडी जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तेथून पाणी घेणे बंद आहे. शहरवासियांना दररोज ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र साठवण क्षमता कमी असल्याने दररोज ६ ते ७ एमएलडी एवढेच पाणी या जलकुंभांमध्ये साठवले जाते. त्यामुळे शहरात सहा-सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलशुद्धीकरण केंद्र हे निजामकालीन आहे. १९६४ मध्ये या केंद्रात साडेनऊ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. त्यानंतर १९८४ मध्ये याच क्षमतेचा तर २००३-०४ मध्ये २२ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. या तीन जलकुंभांमध्ये नवीन जालन्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची साठवण केली जाते. ५० वर्षे जुन्या झालेल्या जलकुंभाच्या पायऱ्यांभोवती नेहमी आग्यामोहोळ असते. यापूर्वी आग्यामोहळाने काही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर तर एका अभियंत्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. त्यामुळे या पायऱ्यांजवळ कोणी जात नाही. शुद्धीकरण केंद्रातील उर्वरीत दोन जलकुंभांमध्ये कर्मचाऱ्यांना आतमध्ये उतरण्यास पायऱ्याच नाहीत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण या लोखंडी पायऱ्यांना उतरती कळा आलेली असल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.या जलकुंभांमध्ये वर्षानुवर्षे स्वच्छता केली जात नाही. अग्निशामक दलाच्या पंपाद्वारे आत पाणी सोडून स्वच्छता केली जाते, असा दावा तेथील कर्मचाऱ्यांकडून केला जातो. परंतु या जलकुंभांची दुरावस्था लक्षात घेता त्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून झालेली नसावी, असे दिसून येते. जालना जिल्हा निर्मितीपूर्वीचा जलकुंभ येथे आहे. परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या जलकुंभावर जाणे म्हणजे जोखीम घेण्यासारखे आहे. नगरपालिकेने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.