शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कठड्यांविना पूल धोकादायक

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते वर्षानुवर्षे कठड्यांविना असून ते धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात.

जालना : शहरातील अत्यंत वर्दळीचे असलेले पाच रस्ते वर्षानुवर्षे कठड्यांविना असून ते धोकादायक बनले आहेत. या मार्गांवर सातत्याने अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडतात. परंतु संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.गरीबशहा बाजार ते मस्तगड या कुंडलिका नदीच्या पुलाचा रस्ता अरूंद आहे. तसेच या रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेक वाहनधारक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही भागात पुलाचे कठडे गायब असल्याने रस्ते चुकविताना वाहन घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सा.बां. विभागाने तसेच नगरपालिकेनेही लक्ष देण्याची गरज आहे.कन्हैय्यानगरजवळ सीना नदीवर असलेल्या पुलावर मागील पाच ते सहा वर्षांपासून दोन्ही बाजूंचे कठडे गायब झालेले आहेत. या पुलावरून जवळच असलेल्या गायत्रीनगर शाळेत अनेक विद्यार्थी पायी ये-जा करतात. तसेच नवीन मोंढा याच रस्त्यावर असल्याने शहरातील व्यापारी, कामगार तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्यावर्षी या पुलावर कठडे नसल्याने मारोती व्हॅन उलटून दोघेजण ठार झाले होते. लक्कडकोट ते देहेडकरवाडी रस्त्यावर चोवीस तास वाहतूक असते. मात्र या पुलावरील कठडेही मोठ्या प्रमाणात गायब झालेले आहेत. सायंकाळनंतर हा रस्ता अंधारात असतो. येथेही अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. परंतु सरकारी यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष होते. भोकरदन नाका ते औरंगाबाद रस्त्यावर रामतीर्थ स्मशानभूमीच्या पुलासमोरील छोट्या पुलाच्या रस्त्यावर देखील कठडे नाहीत. या ठिकाणी देखील अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. मोती तलावासमोरील बायपास रस्त्यावरील कठडे देखील गायब झालेले असून काही वर्षांपूर्वी या रस्त्यावरून ट्रक योगेश्वरी कॉलनीच्या मागील बाजूस पलटी झाला होता. शहरातील प्रमुख मार्गांमध्ये या पाचही रस्त्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे या रस्त्यांवर अपघातांच्या अनेक घटना घडल्या. वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)