शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नफेखोरीच्या नादात प्रवाशांचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 12, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले.

औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले. त्या विमानातील सुमारे ७० प्रवाशांनी १५ सेकंद थरार अनुभवला. पायलटच्या कौशल्यामुळे मोठा अपघात टळला असला तरी त्या घटनेमागील खरे कारण अजूनही दडवून ठेवण्यात आले आहे. मात्र, ते विमान मुंबईहून निघण्यापूर्वी घडलेला प्रकार काही प्रवाशांनी लोकमतला सांगितला. त्या विमानाला मुंबईहून औरंगाबादला निघण्याच्या वेळेतच गडबड झाली होती. ५.४० ही विमान येण्याची वेळ होती. ते विमान ६ वाजून १० मिनिटांनी आले. विमान टेकआॅफला येण्यापूर्वी क्लिनिंग व लगेजला वेळ जातो. ७ मे रोजी ७० प्रवासी विमानाकडे घेऊन जाण्यासाठी विमानतळाची बस आली. विमानाजवळ बस आल्यावर ती १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवली. विमानातील लगेज संपताच प्रवाशांना आत सोडण्यात आले. विमानाचे क्लिनिंग व टेक्निकल तपासणी न करताच ते औरंगाबादच्या दिशेने झेपावले आणि या विमानतळावरील धावपट्टीवर घसरले. विमानाच्या तांत्रिक तपासणीचा वेळ कमी करून जास्तीत फेर्‍या मारण्याच्या हव्यासासाठी कंपन्यांकडून असा प्रकार घडत असल्याचे जेटच्या एका प्रवाशाने सांगितले. नियमानुसार तासभर तपासणी नियमानुसार विमान लँड झाल्यावर तासभर त्याची तपासणी केली जावी. त्यानंतर ते पुढील टेकआॅफसाठी तयार करावे. मात्र, अलीकडे विमाने येण्यात, उतरण्यात आणि पुन्हा उड्डाण करण्याच्या वेळेत ताळमेळ राहिलेला नाही. विमानाचे जास्तीत जास्त ‘युटीलायझेशन’ करण्याच्या नादात कंपन्या विमानाच्या तांत्रिक घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. २८ मार्चला विमान बदलले दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाचे एक विमान ३ वाजून १० मिनिटांनी औरंगाबादकडे निघाले. त्या विमानात येथील उद्योगपती व खासदार होते. विमानाने टेकआॅफ करताच काही वेळाने पायलटच्या लक्षात आले की, योग्य उंचीवर ते उडत नाही. त्यामुळे ते विमान पुन्हा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. दोन तासांनी नवीन विमानाने प्रवाशांना औरंगाबादकडे आणण्यात आले. ५ एप्रिल रोजी पुन्हा तेच विमान दिल्लीहून औरंगाबादच्या दिशेने झेपावले. त्या विमानाला पुन्हा तीच अडचण आली. ते विमान औरंगाबादला लँड होताना धावपट्टीची लाईट गेली. २८ मार्चच्या प्रकाराबद्दल उद्योगपती उल्हास गवळी यांनी एअर इंडिया अ‍ॅथॉरिटीकडे तक्रारही नोंदविली आहे.