शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

९८ हजार हेक्टर्सवरील पिके धोक्यात

By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST

रमेश शिंदे/ महेबूब बक्षी ल्ल औसा दिवसभर उन्हाळ्यासारखं कडक उन्हं तर रात्रभर टिपूर चांदणं़ पावसाळा मध्यावर आला तरी हे चित्र आहे़ औसा तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक

 रमेश शिंदे/ महेबूब बक्षी ल्ल औसा दिवसभर उन्हाळ्यासारखं कडक उन्हं तर रात्रभर टिपूर चांदणं़ पावसाळा मध्यावर आला तरी हे चित्र आहे़ औसा तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पावसाळा संपला तरीही कुठे पाणी नाही़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या पण तब्बल सव्वा महिना झाला पाऊस झाला नाही़ पावसाअभावी ९८ हजार हेक्टरवरील पिके मात्र अखेरच्या घटका मोजताहेत़ पिके तर वाळून जात आहेत़ पण जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे़ पिकांनी माना टाकल्या़ दावणीची जनावरे आशळभूतपणे मालकाच्या हाताकडे पाहत आहेत़ शेतकरी मात्र कोलमडून पडला आहे़ औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो़ १ लाख २१ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र आहे़ यामधील १ लाख ११ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होते़ यावर्षी कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली आहे़ तालुक्यातील ६० हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे़ तर इतर पिकामध्ये २० हजार ७६६ हेक्टरवर तूर, ९ हजार ५२८ ज्वारी, २ हजार २६४ उडीद, २ हजार २१४ मुग, १ हजार २०४ मका, ४३२ भात, २९१ बाजरी, ५१३ भुईमूग, १४७ तीळ, २०७ कारळ व ४७८ हेक्टर क्षेत्रावर इतर पिकाची पेरणी करण्यात आली आहे़ ९ व १० जुलैला पडलेल्या कमी अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या़ त्यानंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडत गेल्यामुळे पीक परिस्थिती चांगली होती़ पण मागील पंधरा दिवसापासून मात्र पाऊस गायब झाल्यामुळे ९८ हजार हेक्टरवरील पिके आता शेवटच्या घटका मोजत आहेत़ पाऊस उशिरा पडल्याने पेरण्या जरी उशीरा झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी व कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली़ पण पावसाअभावी आता शेतकरीच कोलमडून पडला आहे़ दिवसभर कडक उन्ह आणि रात्रभर टिपूर चांदणं़ यामुळे पीक आता अखेरच्या घटका मोजत आहेत़ सध्या तालुक्यातील २५ ते ३० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ नद्या, नाले, तलाव, विहिरी अजूनही कोरड्या आहेत़ पावसाळ्याची अडीच महिने संपले तरीही दमदार पाऊस झालेला नाही़ दुष्काळाची छाया मात्र दिवसेंदिवस गडद होत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़ औसा तालुक्यातील भादा परिसरात यंदाच्या पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झाला नाही़ पेरणीपूर्वी झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली़ त्यात ८० टक्के हे सोयाबीनचे आहे़ पेरणीनंतर एकही पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर नांगर फिरविला आहे़ भादा येथील मधुकर बनसोडे, शिवली येथील इस्माईल तांबोळी, महेबुब तांबोळी, कोरंगळा येथील बाबुराव शिखरे, भादा येथील अझरोद्दीन बक्षी, बाबुलाल होगाडे, अंदोरा येथील शन्नू पटेल, नय्युम पटेल, हारूण शेख, महादेव शेळके, लखनगावचे ज्ञानोबा गोडभरले आदी शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरविला आहे़ ४भादा सर्कलमधील शेकडो शेतकऱ्यांनी खरीप हंगाम गेल्याने आतापासूनच रबीची तयारी सुरू केली आहे़ चांगला पाऊस झाल्यास ज्वारी, गहू, हरभरा पेरण्याची तयारी शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे़ ४ज्या शेतकऱ्यांनी खरीपावर नांगर फिरविला ते शेतकरी कोथिंबीर किंवा अन्य पिकाची लागवड करणार असल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, तालुक्यात विविध ठिकाणी दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत़ पाणीटंचाईची समस्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी त्रस्त आहे़