शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

अतिवृष्टीत जिल्हा परिषदेच्या २४५ कोटींच्या मालमत्तेची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:04 IST

--- नीलेश गटणे : एनडीआरएफच्या निकषानुसार ९ कोटी ९० लाखांचे नुकसान --- औरंगाबाद : जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला ...

---

नीलेश गटणे : एनडीआरएफच्या निकषानुसार ९ कोटी ९० लाखांचे नुकसान

---

औरंगाबाद : जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेने मालमत्ता नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला. यात विविध विभागांतील २४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यापैकी एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ९ कोटी ९० लाखांची नुकसान भरपाई विचारात घेतली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले.

नुकसानीबाबतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा या चार योजनांचे १७.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १४४ ग्रामपंचायतींच्या इमारतीचे १७.२८ कोटी, तर इतर ९८ इमारतींचे ११.७६ कोटी असे एकूण २४२ इमारतींचे २९.०४ कोटींचे नुकसान झाले आहे.

बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ६ हजार ६५५ किलोमीटर रस्त्यांपैकी ६४३ किलोमीटर रस्त्यांचे व पुलांचे २११.४७ कोटींचे नुकसान झालेले आहेत. त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. आरोग्य विभागाच्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे १२.५ लाखांचे नुकसान झाले. तर सिंचन विभागाचे २० बंधाऱ्यांचे पावसाच्या पाण्यात ९ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गटणे यांनी दिली. ही प्राथमिक आकडेवारी आहे. सर्व विभागांना नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले असून त्यासंबंधीची अधिकृत आकडेवारी येण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे.