शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अतिवृष्टीत जिल्हा परिषदेच्या २४५ कोटींच्या मालमत्तेची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:04 IST

--- नीलेश गटणे : एनडीआरएफच्या निकषानुसार ९ कोटी ९० लाखांचे नुकसान --- औरंगाबाद : जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला ...

---

नीलेश गटणे : एनडीआरएफच्या निकषानुसार ९ कोटी ९० लाखांचे नुकसान

---

औरंगाबाद : जिल्ह्यात ७ आणि ८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेने मालमत्ता नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेतला. यात विविध विभागांतील २४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यापैकी एनडीआरएफच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ९ कोटी ९० लाखांची नुकसान भरपाई विचारात घेतली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले.

नुकसानीबाबतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार पाणीपुरवठा विभागाचे कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा या चार योजनांचे १७.५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १४४ ग्रामपंचायतींच्या इमारतीचे १७.२८ कोटी, तर इतर ९८ इमारतींचे ११.७६ कोटी असे एकूण २४२ इमारतींचे २९.०४ कोटींचे नुकसान झाले आहे.

बांधकाम विभागाच्या अखत्यारितील ६ हजार ६५५ किलोमीटर रस्त्यांपैकी ६४३ किलोमीटर रस्त्यांचे व पुलांचे २११.४७ कोटींचे नुकसान झालेले आहेत. त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. आरोग्य विभागाच्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे १२.५ लाखांचे नुकसान झाले. तर सिंचन विभागाचे २० बंधाऱ्यांचे पावसाच्या पाण्यात ९ कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती गटणे यांनी दिली. ही प्राथमिक आकडेवारी आहे. सर्व विभागांना नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले असून त्यासंबंधीची अधिकृत आकडेवारी येण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे.