शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

धरणे कोरडीठाकच

By admin | Updated: August 8, 2016 00:45 IST

व्यंकटेश वैष्णव . बीड आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत.

व्यंकटेश वैष्णव . बीड

आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत. अर्धा पावसाळा संपला तरीही धरणे भरलीच नाहीत. त्यामुळे मागचे दिवस आठवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एकूण १४३ सिंचन प्रकल्प आहेत. पावसाळा थोडा उशिरा सुरू झाला असला तरी आतापर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत ४५.५८ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची तिप्पट अधिक पर्जन्यमानाची नोंद आहे. शासन दरबारी मि.मी. मध्ये पावसाची नोंद बऱ्यापैकी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरण क्षेत्रांमधील जलसाठा होणे आवश्यक आहे. पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४ लघु, तर २ मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणी साठा (मृतसाठा) उपलब्ध झाला आहे. १४३ प्रकल्पांत २ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी मांजरा धरण कोरडे आहे, तर बीड शहराची जीवनदायिनी ठरलेल्या माजलगाव बॅक वॉटर प्रकल्पात ७८.२० द.ल.घ.मी. पाणी साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे पाणी मृतसाठ्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जलयुक्तमुळे तात्पुरता आधार बीड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात छोट्या छोट्या बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा परिणाम काही विहीर व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ज्या भागात खडकाळ जमीन आहे, त्या भागातच पाणी पातळी वाढली आहे. अन्यथा ज्या भागात कडक खडक आहेत, त्या भागात अजून तरी विहिरी, बोअर कोरडेठाक आहेत. आजघडीला केज, धारूर या तालुक्यांमध्ये ३५ च्या वर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी पातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील बीड तालुक्यातील टँकर सरसकट बंद केले आहेत. यामुळे काही गावांना भरपावसाळ्यातही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झालेला आहे, तो देखील मृतच आहे. त्यामुळे ते पाणी सध्या तरी पिण्यासाठी वापरता येणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञांचे मत आहे.