शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

धरणे कोरडीठाकच

By admin | Updated: August 8, 2016 00:45 IST

व्यंकटेश वैष्णव . बीड आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत.

व्यंकटेश वैष्णव . बीड

आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत. अर्धा पावसाळा संपला तरीही धरणे भरलीच नाहीत. त्यामुळे मागचे दिवस आठवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एकूण १४३ सिंचन प्रकल्प आहेत. पावसाळा थोडा उशिरा सुरू झाला असला तरी आतापर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत ४५.५८ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची तिप्पट अधिक पर्जन्यमानाची नोंद आहे. शासन दरबारी मि.मी. मध्ये पावसाची नोंद बऱ्यापैकी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरण क्षेत्रांमधील जलसाठा होणे आवश्यक आहे. पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४ लघु, तर २ मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणी साठा (मृतसाठा) उपलब्ध झाला आहे. १४३ प्रकल्पांत २ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी मांजरा धरण कोरडे आहे, तर बीड शहराची जीवनदायिनी ठरलेल्या माजलगाव बॅक वॉटर प्रकल्पात ७८.२० द.ल.घ.मी. पाणी साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे पाणी मृतसाठ्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जलयुक्तमुळे तात्पुरता आधार बीड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात छोट्या छोट्या बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा परिणाम काही विहीर व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ज्या भागात खडकाळ जमीन आहे, त्या भागातच पाणी पातळी वाढली आहे. अन्यथा ज्या भागात कडक खडक आहेत, त्या भागात अजून तरी विहिरी, बोअर कोरडेठाक आहेत. आजघडीला केज, धारूर या तालुक्यांमध्ये ३५ च्या वर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी पातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील बीड तालुक्यातील टँकर सरसकट बंद केले आहेत. यामुळे काही गावांना भरपावसाळ्यातही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झालेला आहे, तो देखील मृतच आहे. त्यामुळे ते पाणी सध्या तरी पिण्यासाठी वापरता येणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञांचे मत आहे.