शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धरणे कोरडीठाकच

By admin | Updated: August 8, 2016 00:45 IST

व्यंकटेश वैष्णव . बीड आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत.

व्यंकटेश वैष्णव . बीड

आतापर्यंत झालेल्या पावसाने खरिपाची पिके जोमात असली तरी बोटावर मोजण्याइतके लघुप्रकल्प वगळता बहुतांश तलाव, धरणे कोरडीठाकच आहेत. अर्धा पावसाळा संपला तरीही धरणे भरलीच नाहीत. त्यामुळे मागचे दिवस आठवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात एकूण १४३ सिंचन प्रकल्प आहेत. पावसाळा थोडा उशिरा सुरू झाला असला तरी आतापर्यंत एकूण सरासरीच्या तुलनेत ४५.५८ टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत पावसाची तिप्पट अधिक पर्जन्यमानाची नोंद आहे. शासन दरबारी मि.मी. मध्ये पावसाची नोंद बऱ्यापैकी दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी धरण क्षेत्रांमधील जलसाठा होणे आवश्यक आहे. पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४ लघु, तर २ मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणी साठा (मृतसाठा) उपलब्ध झाला आहे. १४३ प्रकल्पांत २ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी मांजरा धरण कोरडे आहे, तर बीड शहराची जीवनदायिनी ठरलेल्या माजलगाव बॅक वॉटर प्रकल्पात ७८.२० द.ल.घ.मी. पाणी साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे पाणी मृतसाठ्यात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. जलयुक्तमुळे तात्पुरता आधार बीड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात छोट्या छोट्या बंधाऱ्यात पाणी साठले आहे. याचा परिणाम काही विहीर व बोअर यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ज्या भागात खडकाळ जमीन आहे, त्या भागातच पाणी पातळी वाढली आहे. अन्यथा ज्या भागात कडक खडक आहेत, त्या भागात अजून तरी विहिरी, बोअर कोरडेठाक आहेत. आजघडीला केज, धारूर या तालुक्यांमध्ये ३५ च्या वर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र भूजल सर्वेक्षण विभागाचा पाणी पातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील बीड तालुक्यातील टँकर सरसकट बंद केले आहेत. यामुळे काही गावांना भरपावसाळ्यातही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा झालेला आहे, तो देखील मृतच आहे. त्यामुळे ते पाणी सध्या तरी पिण्यासाठी वापरता येणे शक्य नसल्याचे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञांचे मत आहे.