शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दुग्ध व्यवसायाने चिकलठाणच्या शेतकऱ्यांच्या जीवनात भरले रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST

सुरेश चव्हाण कन्नड : प्रत्येक गावाचे वर्षानुवर्षे कोणते ना कोणते वेगळे वैशिष्ट्य असते आणि त्यावरच त्या गावाची ओळख ठरते. ...

सुरेश चव्हाण

कन्नड : प्रत्येक गावाचे वर्षानुवर्षे कोणते ना कोणते वेगळे वैशिष्ट्य असते आणि त्यावरच त्या गावाची ओळख ठरते. मात्र, चिकलठाणच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत, या व्यवसायातून गावाला एक नवीन ओळख निर्माण करुन दिली आहे. दुधाने येथील शेतकऱ्यांच्या जीवनात विविध रंग भरले असून, अर्थकारणाला कलाटणी मिळाली आहे.

दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. यातून दूध, दही, ताक, लोणी, तूप हे पदार्थ मिळतात. त्याशिवाय मिळणारे शेणखत शेतीमध्ये सुपीकता आणते. या पारंपरिक व्यवसायाला चिकलठाणच्या तरुण शेतकऱ्यांनी सुधारित आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन गावाचे अर्थकारण बदलून टाकले आहे. चिकलठाणची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार असून, येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. हे गाव पूर्वी उसाचे गाव म्हणून ओळखले जात होते. मात्र, दुष्काळी परिस्थितीने गावची ओळख पुसली गेली. निसर्गाचा लहरीपणा, शेतीला लागणारा खर्च व मिळणारा भाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतीव्यवसाय तोट्यात जाऊ लागला. यामुळे गावातील सुशिक्षित बेकार तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. पंजाब व हरियाणा राज्यातून तसेच सातारा, कोल्हापूर, लोणी-प्रवरा येथून जास्त दूध देणाऱ्या गायी खरेदी केल्या. गायींना चारा म्हणून मुरघास दिला जातो. मुरघास तयार करताना मक्याच्या चाऱ्याच्या कुट्टीत मिठाचा वापर करतात. दिवसभरात एका गायीला ५० किलो मुरघास दिला जातो. ५० टक्के मका, ३० टक्के गहू व २० टक्के सोयाबीन यांचा भरडा सकाळ व संध्याकाळ मिळून ७ किलो दिला जातो. दुधाळ गायीची झीज भरून निघण्यासाठी मिनरल मिक्स्चरचा वापर केला जातो. गायींना डासांचा त्रास होऊ नये म्हणून गोठ्यात फॅन बसविण्यात आलेले आहेत. गायींच्या आरोग्यासाठी पशुचिकित्सकांचा सल्ला घेतला जातो.

चौकट

दररोज बारा हजार लिटर दूध संकलित

सध्या गावात २० मुक्तगोठे आहेत. प्रत्येक गोठ्यामध्ये सुधारित प्रजातींच्या ५ ते २० पर्यंत गायी आहेत. २० लिटरपासून ४२ लिटरपर्यंत दूध देणारी गाय येथे आहे. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. गावात ९ दूध संकलन केंद्रे आहेत. दररोज १ लिटर ते ३७५ लिटर दूध संकलन केंद्रावर टाकणारे शेतकरी आहेत. गावातून दररोज सुमारे १२ हजार लिटर दूध संकलित केले जाते. एका दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादित करणारे जिल्ह्यात असे दुसरे गाव नाही.

कोट...

भाववाढ होण्याची आवश्यकता

सध्या दुधाचा भाव प्रतिलिटर २२ रुपये असल्याने सध्या हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. त्यामुळे भाववाढ होण्याची गरज आहे. शासनाने एफआरपी लावण्याचा निर्णय घेतल्याने दुग्धोत्पादक आशादायी आहेत.

- सुधीर चव्हाण, शेतकरी

फोटो : चिकलठाण येथे असलेला मुक्त गोठा.

270621\27_2_abd_74_27062021_1.jpg

चिकलठाण येथे असलेला मुक्त गोठा.