शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल आतापर्यंत २१६८ पैकी २१५९ शाळांकडून प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ९ शाळांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या दैनंदिन उपस्थिती अहवालात म्हटले आहे.

दैनंदिन मिळणाऱ्या अहवालावरून कमी उपस्थिती असलेल्या शाळांना उपस्थिती वाढवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सुरू असून, त्यात आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता शाळांकडून करून घेतली जात आहे. ग्रामीण शाळांमध्ये पालकांच्या संमतीपत्रांची संख्या वाढत असून उपस्थितीही वाढत आहे. मात्र, अद्याप ५० टक्क्यांवर उपस्थिती न गेल्याने गळतीकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती शाळांकडून व्यक्त होत आहे, सुमारे दहा महिने शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊन रमावेत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---

नऊ शाळा अद्याप सुरू नाहीत

पाचवी ते आठवीसाठी ७८०६ शिक्षक आहेत. त्यापैकी ७२७५ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ६ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले, तर ६९१६ शिक्षकांनी आतापर्यंत अहवाल शाळांत सादर केले. गंगापूर १, कन्नड ४, खुलताबाद येथील चार शाळांकडून माहिती न मिळाल्याने त्या बंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

---

विद्यार्थी संख्या, पट, उपस्थिती, शिक्षकांची तपासणी त्याही लिंक भरल्या. शाळा सुरू झाल्यावर नियमित लिंक येत होत्या. आताही जेव्हा लिंक येतात. तेव्हा भरून पाठवतो. त्यात काही अडचणी येत नाहीत.

-अनिता व्याहाळकर, मुख्याध्यापिका, जि. प. प्रशाला आंबेलोहळ

--

शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. जेव्हा माहिती मागवण्यासाठी लिंक येतात. त्या नियमित भरतो. मात्र, विद्यार्थी अनुपस्थिती नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक आहे. हे प्रमाण गळतीच्या दिशेकडे दिसते. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची गोडी लावून शाळेत आणणे आव्हान बनले आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

---

पाचवी ते आ‌ठवीच्या शाळांकडून वेळोवेळी ऑनलाइन लिंक पाठवून शाळांकडून माहिती मागवण्यात येते. शाळा ती माहिती भरून पाठवतात. उपस्थिती वाढत आहे. नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या केंद्राच्या अखत्यारीतील शाळा शिक्षण विभागाला रिपोर्टिंग करत नाहीत. काही शाळा निवासी असल्याने बंद असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ शाळांकडून माहिती मिळालेली नाही.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

---

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा : २१६८

जिल्ह्यात पाचवी ते आठवी सुरू झालेल्या शाळा : २१५९

विद्यार्थी संख्या : २,२०,७८४

उपस्थिती संख्या : १,१८,७४२

--

अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

गंगापूर : २६५

कन्नड : २९७

सिल्लोड : २६९

खुलताबाद : १३५

सोयगाव : ८८

पैठण : २७३

फुलंब्री : २३८

औरंगाबाद : २८८

वैजापूर : ३०६