शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल आतापर्यंत २१६८ पैकी २१५९ शाळांकडून प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ९ शाळांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या दैनंदिन उपस्थिती अहवालात म्हटले आहे.

दैनंदिन मिळणाऱ्या अहवालावरून कमी उपस्थिती असलेल्या शाळांना उपस्थिती वाढवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सुरू असून, त्यात आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता शाळांकडून करून घेतली जात आहे. ग्रामीण शाळांमध्ये पालकांच्या संमतीपत्रांची संख्या वाढत असून उपस्थितीही वाढत आहे. मात्र, अद्याप ५० टक्क्यांवर उपस्थिती न गेल्याने गळतीकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती शाळांकडून व्यक्त होत आहे, सुमारे दहा महिने शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊन रमावेत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---

नऊ शाळा अद्याप सुरू नाहीत

पाचवी ते आठवीसाठी ७८०६ शिक्षक आहेत. त्यापैकी ७२७५ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ६ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले, तर ६९१६ शिक्षकांनी आतापर्यंत अहवाल शाळांत सादर केले. गंगापूर १, कन्नड ४, खुलताबाद येथील चार शाळांकडून माहिती न मिळाल्याने त्या बंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

---

विद्यार्थी संख्या, पट, उपस्थिती, शिक्षकांची तपासणी त्याही लिंक भरल्या. शाळा सुरू झाल्यावर नियमित लिंक येत होत्या. आताही जेव्हा लिंक येतात. तेव्हा भरून पाठवतो. त्यात काही अडचणी येत नाहीत.

-अनिता व्याहाळकर, मुख्याध्यापिका, जि. प. प्रशाला आंबेलोहळ

--

शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. जेव्हा माहिती मागवण्यासाठी लिंक येतात. त्या नियमित भरतो. मात्र, विद्यार्थी अनुपस्थिती नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक आहे. हे प्रमाण गळतीच्या दिशेकडे दिसते. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची गोडी लावून शाळेत आणणे आव्हान बनले आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

---

पाचवी ते आ‌ठवीच्या शाळांकडून वेळोवेळी ऑनलाइन लिंक पाठवून शाळांकडून माहिती मागवण्यात येते. शाळा ती माहिती भरून पाठवतात. उपस्थिती वाढत आहे. नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या केंद्राच्या अखत्यारीतील शाळा शिक्षण विभागाला रिपोर्टिंग करत नाहीत. काही शाळा निवासी असल्याने बंद असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ शाळांकडून माहिती मिळालेली नाही.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

---

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा : २१६८

जिल्ह्यात पाचवी ते आठवी सुरू झालेल्या शाळा : २१५९

विद्यार्थी संख्या : २,२०,७८४

उपस्थिती संख्या : १,१८,७४२

--

अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

गंगापूर : २६५

कन्नड : २९७

सिल्लोड : २६९

खुलताबाद : १३५

सोयगाव : ८८

पैठण : २७३

फुलंब्री : २३८

औरंगाबाद : २८८

वैजापूर : ३०६