शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल आतापर्यंत २१६८ पैकी २१५९ शाळांकडून प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ९ शाळांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या दैनंदिन उपस्थिती अहवालात म्हटले आहे.

दैनंदिन मिळणाऱ्या अहवालावरून कमी उपस्थिती असलेल्या शाळांना उपस्थिती वाढवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सुरू असून, त्यात आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता शाळांकडून करून घेतली जात आहे. ग्रामीण शाळांमध्ये पालकांच्या संमतीपत्रांची संख्या वाढत असून उपस्थितीही वाढत आहे. मात्र, अद्याप ५० टक्क्यांवर उपस्थिती न गेल्याने गळतीकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती शाळांकडून व्यक्त होत आहे, सुमारे दहा महिने शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊन रमावेत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---

नऊ शाळा अद्याप सुरू नाहीत

पाचवी ते आठवीसाठी ७८०६ शिक्षक आहेत. त्यापैकी ७२७५ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ६ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले, तर ६९१६ शिक्षकांनी आतापर्यंत अहवाल शाळांत सादर केले. गंगापूर १, कन्नड ४, खुलताबाद येथील चार शाळांकडून माहिती न मिळाल्याने त्या बंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

---

विद्यार्थी संख्या, पट, उपस्थिती, शिक्षकांची तपासणी त्याही लिंक भरल्या. शाळा सुरू झाल्यावर नियमित लिंक येत होत्या. आताही जेव्हा लिंक येतात. तेव्हा भरून पाठवतो. त्यात काही अडचणी येत नाहीत.

-अनिता व्याहाळकर, मुख्याध्यापिका, जि. प. प्रशाला आंबेलोहळ

--

शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. जेव्हा माहिती मागवण्यासाठी लिंक येतात. त्या नियमित भरतो. मात्र, विद्यार्थी अनुपस्थिती नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक आहे. हे प्रमाण गळतीच्या दिशेकडे दिसते. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची गोडी लावून शाळेत आणणे आव्हान बनले आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

---

पाचवी ते आ‌ठवीच्या शाळांकडून वेळोवेळी ऑनलाइन लिंक पाठवून शाळांकडून माहिती मागवण्यात येते. शाळा ती माहिती भरून पाठवतात. उपस्थिती वाढत आहे. नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या केंद्राच्या अखत्यारीतील शाळा शिक्षण विभागाला रिपोर्टिंग करत नाहीत. काही शाळा निवासी असल्याने बंद असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ शाळांकडून माहिती मिळालेली नाही.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

---

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा : २१६८

जिल्ह्यात पाचवी ते आठवी सुरू झालेल्या शाळा : २१५९

विद्यार्थी संख्या : २,२०,७८४

उपस्थिती संख्या : १,१८,७४२

--

अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

गंगापूर : २६५

कन्नड : २९७

सिल्लोड : २६९

खुलताबाद : १३५

सोयगाव : ८८

पैठण : २७३

फुलंब्री : २३८

औरंगाबाद : २८८

वैजापूर : ३०६