शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

२१५९ शाळांकडून मिळतोय दैनंदिन अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून झाले असून विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांची तपासणी, एकूण बाधित असा दैनंदिन अहवाल आतापर्यंत २१६८ पैकी २१५९ शाळांकडून प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ९ शाळांकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या शाळा बंद असल्याचे शिक्षण विभागाच्या ११ फेब्रुवारीच्या दैनंदिन उपस्थिती अहवालात म्हटले आहे.

दैनंदिन मिळणाऱ्या अहवालावरून कमी उपस्थिती असलेल्या शाळांना उपस्थिती वाढवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या जात आहेत. त्यात अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी सुरू असून, त्यात आढळून येणाऱ्या त्रुटींची पूर्तता शाळांकडून करून घेतली जात आहे. ग्रामीण शाळांमध्ये पालकांच्या संमतीपत्रांची संख्या वाढत असून उपस्थितीही वाढत आहे. मात्र, अद्याप ५० टक्क्यांवर उपस्थिती न गेल्याने गळतीकडे वाटचाल सुरू झाल्याची भीती शाळांकडून व्यक्त होत आहे, सुमारे दहा महिने शाळेपासून दुरावलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊन रमावेत यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

---

नऊ शाळा अद्याप सुरू नाहीत

पाचवी ते आठवीसाठी ७८०६ शिक्षक आहेत. त्यापैकी ७२७५ शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यातून ६ शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आले, तर ६९१६ शिक्षकांनी आतापर्यंत अहवाल शाळांत सादर केले. गंगापूर १, कन्नड ४, खुलताबाद येथील चार शाळांकडून माहिती न मिळाल्याने त्या बंद असल्याचे अहवालात म्हटले आहे.

---

विद्यार्थी संख्या, पट, उपस्थिती, शिक्षकांची तपासणी त्याही लिंक भरल्या. शाळा सुरू झाल्यावर नियमित लिंक येत होत्या. आताही जेव्हा लिंक येतात. तेव्हा भरून पाठवतो. त्यात काही अडचणी येत नाहीत.

-अनिता व्याहाळकर, मुख्याध्यापिका, जि. प. प्रशाला आंबेलोहळ

--

शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. जेव्हा माहिती मागवण्यासाठी लिंक येतात. त्या नियमित भरतो. मात्र, विद्यार्थी अनुपस्थिती नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक आहे. हे प्रमाण गळतीच्या दिशेकडे दिसते. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची गोडी लावून शाळेत आणणे आव्हान बनले आहे.

-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला गणोरी

---

पाचवी ते आ‌ठवीच्या शाळांकडून वेळोवेळी ऑनलाइन लिंक पाठवून शाळांकडून माहिती मागवण्यात येते. शाळा ती माहिती भरून पाठवतात. उपस्थिती वाढत आहे. नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय या केंद्राच्या अखत्यारीतील शाळा शिक्षण विभागाला रिपोर्टिंग करत नाहीत. काही शाळा निवासी असल्याने बंद असून आतापर्यंत जिल्ह्यातील ९ शाळांकडून माहिती मिळालेली नाही.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग

---

जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा : २१६८

जिल्ह्यात पाचवी ते आठवी सुरू झालेल्या शाळा : २१५९

विद्यार्थी संख्या : २,२०,७८४

उपस्थिती संख्या : १,१८,७४२

--

अहवाल देणाऱ्या तालुकानिहाय शाळा

गंगापूर : २६५

कन्नड : २९७

सिल्लोड : २६९

खुलताबाद : १३५

सोयगाव : ८८

पैठण : २७३

फुलंब्री : २३८

औरंगाबाद : २८८

वैजापूर : ३०६