शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दलालांची ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:21 IST

आर्थिक पिळवणूक : वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल

वैजापूर : तालुक्यात दर महिन्याला होणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पलाही दलालांचा विळखा पडला आहे. त्यामुळे परवाना, पासिंग करण्यासाठी येथे वाहनधारकांना दलालांचीच मदत घ्यावी लागते. कमी किंमतीत होणारी कामे दलाल अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन करत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कॅम्पमधील दलालांना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.वैजापूरच्या मासिक कॅम्पमध्ये नवीन वाहनांची पासिंग, वाहन चालविण्याचा कच्चा आणि पक्का परवाना, नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन आदी कामे केली जातात. डेपो रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दर महिन्याच्या दुसºया आठवड्यात आरटीओ कॅम्प आयोजित केला जात असल्यामुळे तालुक्यातील १६४ गावातील नागरिकांना आरटीओशी संबंधित इतर कामे येथे करणे सहज शक्य झाल्याने शहरवासी आणि तालुक्यातील गरजूंना एक चांगली सुविधा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र दलालांचा सुळसुळाट वाढल्याने उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.कॅम्पच्या ठिकाणी १५ ते २० दलालांनी चक्क टेबल, खुर्च्या लावून आपली दुकानदारी सुरू केली आहे.दर महिन्याला आरटीओद्वारे काही शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करून काही कक्षात कामकाज सुरू असते. पण त्यांच्यासोबत दलालांची गरज काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. सार्वजनिक विभागही आरटीओ वगळता इतर एजंट-दलालांना विश्रामगृह परिसरात प्रतिबंध का घालत नाहीत, हाही प्रश्न आहे. आरटीओ कॅम्पमध्ये पारदर्शक सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.‘बंधू’कोण?वैजापूरच्या आरटीओ कॅम्पमध्ये दर महिन्याला एजंटकडून कलेक्शन करण्यासाठी औरंगाबादचा ‘बंधू’ म्हणून परिचित असलेला एजंट येत असतो. या एजंटचा थाटबाट आरटीओपेक्षा भारी आहे. वाहन चालविण्याचे ट्रायल घेणे, कागदपत्र तपासणे, एजंटकडून कलेक्शन जमा करण्याचे काम हा ‘बंधू’ करत असतो. सध्या आॅनलाईन प्रणालीच नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. आरटीओची आॅनलाइन सेवा बºयाचदा आॅफलाईन जात असल्याने तालुक्यातील नागरिकांना नाईलाजस्तव कॅम्पमध्ये दलालाची मदत घ्यावीच लागते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा