शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

सायबर पोलीस ठाणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:28 IST

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांची तातडीने उकल होण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि पोलीस आयुक्तालयांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्याची गृहमंत्रालयाने केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे. विशेष म्हणजे याबाबतचे शासन निर्णयाचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही.

ठळक मुद्देवाढते गुन्हे : गृहमंत्रालयाची घोषणा कागदावरच; परिपत्रकाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांची तातडीने उकल होण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि पोलीस आयुक्तालयांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे उभारण्याची गृहमंत्रालयाने केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे. विशेष म्हणजे याबाबतचे शासन निर्णयाचे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही.भामट्यांकडून आॅनलाईन गंडविण्याच्या घटना सतत घडतात. फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून बदनामी करण्याचे प्रकार, वेबसाईट हॅक करणे आणि ट्युटर, व्हॉटस्अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावरून एखाद्याची बदनामी करणारी क्लीप, छायाचित्रे अपलोड करून बदनामी करण्याच्या तक्र ारी सतत पोलिसांना प्राप्त होतात. गतवर्षी शहरातील विविध पोलीस ठाण्यात १४८ गुन्हे नोंदविण्यात आले होते. यात १०० हून अधिक गुन्हे हे आॅनलाईन फसवणुकीचे होते. विभागीय आयुक्त कार्यालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थांची वेबसाईट हॅक करणे, विविध मोठ्या कंपन्यांचा महत्त्वाचा डाटा चोरण्याच्या घटनाही गतवर्षी घडल्या. असे गुन्हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना पकडून त्यांना जेलमध्ये डांबण्याची कारवाई करण्यासाठी पाच ते सहा वर्षांपूर्वी शहर आयुक्तालयात आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्र्यालयासह राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि पोलीस आयुक्तालयात सायबर क्राईम सेलची स्थापना करण्यात आली. पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि आठ ते दहा कर्मचारी प्रत्येक सेलसाठी देण्यात आले. सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सायबर सेलचे रुपांतर पोलीस ठाण्यात करण्याची घोषणा शासनाने केली. या घोषणेनंतर याबाबतचा स्वतंत्र जी. आर. जारी करण्यात आला. मात्र हा जी. आर.जारी झाल्यापासून आजपर्यंत सायबर क्राईम सेलचे रूपांतर पोलीस ठाण्यात करण्यात आले नाही. परिणामी सायबर क्राईमचे गुन्हे नुसते दाखल होत असून, त्याचा तपास लावण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने सायबर गुन्ह्यांच्या फाईल विशिष्ट मुदतीनंतर बंद केल्या जात आहेत.पोलीस निरीक्षक तपास अधिकारीसायबर गुन्हेगाराने केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास केवळ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांनी करावा, असा कायदाच अस्तित्वात आहे. सध्याच्या नियमानुसार घटना जेथे घडली त्या ठाण्यात सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदवून त्या ठाण्याच्या निरीक्षकांकडे तपास सोपविण्यात येतो. मात्र या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अधिकारी निष्णात असणे आवश्यक असते. प्रत्येक निरीक्षक यात एक्स्पर्ट नसल्याने त्यांच्याकडून केवळ गुन्ह्यांची माहिती सायबर सेलकडे पाठविण्याचे सोपस्कार केले जातात.