शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभाराने ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 21:53 IST

तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्येमहावितरणकडून वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक कंटाळले आहेत. गावातील अनेकांना मीटर रिडींगप्रमाणे देयके न देता अंदाजे बिले दिली जात आहेत. वीज बिल न भरल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करण्याच्या धमक्या देत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. गावातील अनेक ग्राहकांचे वीज मिटर तपासणीसाठी महावितरणचे कर्मचारी घेऊन गेले आहेत. मात्र, तीन-तीन महिने या मीटरची तपासणी केली जात नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे नवीन वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरुनही मीटर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. ग्राहकांना घरपोच देयके न देता अन्यत्र ठेवली जात असल्याने ग्राहकांना ती मिळत नाहीत. त्यामुळे ती वेळेत भरली जात नाहीत. विलंबाने बिले भरल्यास ग्राहकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे भरमसाठी वीज देयके, मीटर तपासणी, नवीन मीटर जोडणी आदी संदर्भात महावितरण कार्यालयात तक्रारी करुनही याचे निवारण करण्यास महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारीही स्थानिक कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहे. विजयनगर या वसाहतीत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामारे जावे लागत असल्याचे गावातील विठ्ठल त्रिभुवन, सुरेश जाधव, बिस्समिल्लाबी शेख, विमलबाई खंडागळे आदींनी सांगितले.

आंदोलनाचा इशारामहावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले असून तक्रारीचे निवारणही होत नसल्यामुळे ग्राहकात असंतोष धुमसत आहेत. विजयनगरात ३ फेजची व्यवस्था करुन विज पुरवठा सुरळीत करावा, ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात यावी, अन्यथा ८ एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रतन अंबिलवादे, रज्जाक शेख, विठ्ठल त्रिभुवन, सुलेमान शेख, बशीर पठाण, मिना पारखे, सुजाता बागुल, सावित्रीबाई त्रिभुवन,छाया त्रिभुवन, शोभा जाधव, समिना पठाण, परवीन शेख, आशा सोनवणे, शिल्पा जाधव, सुरेखा वंजारे, जया थोरात, जयश्री थोरात, राधाबाई पोपळघट, सोनाली हिवाळे आदींनी दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWalujवाळूज