शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’च्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 18, 2014 01:49 IST

उस्मानाबाद : बियाणांचे नमुने तपासणीसाठी विलंबाने पाठविणे, तपासणी अहवाल जुलैमध्ये प्राप्त होणे आणि आवश्यक कार्यवाहीकडे कृषी विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे

उस्मानाबाद : बियाणांचे नमुने तपासणीसाठी विलंबाने पाठविणे, तपासणी अहवाल जुलैमध्ये प्राप्त होणे आणि या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याकडे कृषी विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्यानेच दर्जाहीन सोयाबीन बियाणांचे वितरण झाले. मात्र, याचे पाप आता कृषी विभागाकडून वितरक, विक्रेत्यांच्या माथी मारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरवर्षी अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना कृषी विभाग मात्र, याबाबत कमालीचा हलगर्जीपणा दाखवित असल्याने संताप व्यक्त होत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येऊन जून मध्यावधीपर्यंत पेरण्या अपेक्षित असतात. त्यानुसारच कृषी विभागाने बियाणांच्या वितरणाची तसेच त्याचा दर्जा तपासण्याबाबतची कार्यवाही अनुसरणे अपेक्षित आहे. यंदाचा जून महिना कोरडाच गेला. मात्र, या महिन्यात कृषी विभागाने नियमानुसार कार्यवाही अनुसरली नाही. नमुने तपासणीसाठी विलंब झाला. त्यात संबंधित बीज परिक्षण प्रयोग शाळेने उशिराने म्हणजे तब्बल पंधरा दिवसाने बियाणांच्या उगवणक्षमतेचा अहवाल पाठविला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जून महिन्यात अवघ्या पाच तपासणी नमुन्यांचा अहवाल जिल्हा कृषी कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. तर पाच जुलैनंतर २३ नमुन्यांची उगवणक्षमता कमी असल्याचे बीज परिक्षण प्रयोगशाळेने कळविले. जुलैपर्यंत वितरक, विक्रेते या अहवालाची वाट कशी पहाणार? पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्यांनी बियाणाच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी केली. आणि बघता बघता मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यातील बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेल्या कृषी विभागाला जाग आली. सोयाबीनचे २८ नमुने तपासणीत दर्जाहिन असल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी आता वितरक, विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ५ जुलैनंतर उगवण क्षमता तपासणीचा अहवाल येणार असेल तर विक्रेत्यांनी तोपर्यंत शेतकऱ्यांना बियाणांची विक्री करायची नव्हती का? असा प्रश्न या निमित्ताने विक्रेत्यांतून उपस्थित केला जात आहे. कृषी विभागाने नमुने तपासणी वेळेत केली असती तर हा प्रकार घडला नसता, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रत्येक वर्षी निकृष्ट बियाणांचा प्रकार घडून शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना याबाबत प्रशासनाने ठोस कारवाई करून हा प्रकार थांबविण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी)...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई कराजून महिना सुरु झाल्यापासून कृषी विभाग सज्ज झाल्याचे तसेच मुबलक बियाणे उपलब्ध करुन दिल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत होते. महिनाभर गप्प असलेला हा विभाग अर्धा जुलै महिना उलटल्यानंतर उगवण क्षमता कमी आढळल्याचे सांगत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कार्यवाहीचे या विभागाकडून वेळीच पालन झाले असते. तर कमी उगवण क्षमता आढळून आलेल्या बियाणांचे वितरणच झाले नसते. पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसानही टळले असते. वितरक, विक्रेत्यांनी केवळ बियाणांच्या हाताळणीत चूक केली असेल असा अंदाज वर्तवित त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असेल तर संबंधित कंपन्यासह या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत अशी मागणी आता जोर धरत आहे. ५३ टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता२८ पैकी २२ नमुन्यांची उगवणक्षमता ५३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या, विक्रेते आणि वितरक कोर्ट केसेससाठी पात्र असून त्यानुषंगाने जि.प. कृषी विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. अप्रमाणित बियाणे आढळून आलेल्यामध्ये ग्रीनगोल्डचे १४ नमुने, कृषीधनचे ०३, अंकुरचे ०२, महाबीजचे ०२, इगलचे ०१, ओसवालचे ०१, विगर बायोटेकचे ०१, वसंत अ‍ॅग्रोचे ०३ तर गोल्ड सीड्सचे ०१ असे २८ नमुन्यांचा समावेश आहे. यापैकी २२ नमुन्यांच्या बियाण्याची उगवणक्षमता ही ५३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. ज्या बियाण्याची उगवणक्षमता ५३ टक्क्यांपेक्षा कमी असते, त्या कंपन्या, विक्रेते आणि वितरकांवर कोर्ट कसेससाठी पात्र असतात. तर ज्या बियाण्याची उगवणक्षमता ५३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि ७० टक्क्यांच्या आत असते, अशा कंपन्यांना ताकिद दिली जाते, असे जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी आर. एन. काळे यांनी सांगितले. तपासणी अहवालाला विलंबयंदा बियाणे बाजारपेठेत येण्यास उशीर झाला. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर कृषी विभागाकडून ‘रॅन्डमली’ नमुने घेऊन ते परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. परंतु, तेथे पाठविल्यानंतर त्याचे रिपोर्ट पंधरा ते वीस दिवसांनंतर आले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित दुकानदारांना नोटिसा देऊन विक्रीबंद आदेश दिले होते. परंतु, तोवर संबंधित लॉट क्रमांकाच्या बियाणाची विक्री झाली होती. असे प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनियार यांनी सांगितले.