शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

निर्बंधाआधीच रविवारी बाजारात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध लावण्यात येणार आहेत. निर्बंध लागण्याआधीच रविवारचा मुहूर्त साधत ग्राहकांनी खरेदीसाठी ...

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे शहरात निर्बंध लावण्यात येणार आहेत. निर्बंध लागण्याआधीच रविवारचा मुहूर्त साधत ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी पावसाला सुरुवात होताच ग्राहक गायब झाले.

दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या १०० च्या आत येताच शहर अनलॉक करण्यात आले होते. यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण होते, पण हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण, कोरोनाची तिसरी लाट येणार या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या यादीत टाकले. यात औरंगाबादचाही समावेश आहे. जिल्ह्यात काय निर्बंध असतील, याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी जाहीर करणार आहेत. पुन्हा एकदा बाजारपेठेत दुकानाच्या वेळेवर निर्बंध येणार आहे. यामुळे ऐनवेळी फजिती नको म्हणून रविवारी सकाळपासून ग्राहकांनी आवश्यक विविध सामान खरेदीसाठी बाजारात गर्दी सुरू केली होती. दुपारनंतर शहागंज, सराफा बाजार, सिटीचौक, मछलीखडक, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगारगल्ली, औरंगपुरा, पैठणगेट या भागात खरेदीसाठी जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. दिवसभर शहरावर आभाळमाया होती. पण, सायंकाळी पावसाला सुरुवात झाली आणि सर्व ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला. यामुळे जालना रोड, गजानन महाराज मंदिर रोड, गारखेडा, काल्डाकॉर्नर, पीर बाजार, उस्मानपुरा, या भागात वाहनांची गर्दी झाली होती. शहरात कारधारकांची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यावर सर्वत्र कार व दुचाकीच दिसून येत होत्या. रस्ते सामसूम झाले होते. शहागंजात फळ विक्रेत्यांनी पावसाचा अंदाज घेऊन लवकरच हातगाड्या घराकडे नेल्या. रविवारी चांगला व्यवसाय होईल, या आशेने दुकानाचे शटर उघडलेल्या व्यापारी वर्गात मात्र, सायंकाळनंतर निराशा पसरली होती.