शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

औरंगाबाद जिल्ह्यात पाहुण्यांची अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:43 IST

नाताळ सणाला लागून सलग तीन दिवस सुट्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही नाताळनिमित्त दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्याने रविवारी पर्यटनाची राजधानी औरंगाबाद पाहुण्यांनी गजबजली होती.

औरंगाबाद/ खुलताबाद/फर्दापूर : नाताळ सणाला लागून सलग तीन दिवस सुट्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही नाताळनिमित्त दहा दिवसांच्या सुट्या जाहीर केल्याने रविवारी पर्यटनाची राजधानी औरंगाबाद पाहुण्यांनी गजबजली होती. ऐतिहासिक बीबीका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यानात पाय ठेवण्यालाही जागा नव्हती. अजिंठा, वेरूळ लेणीसह खुलताबाद, दौलताबादेत पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे. त्यात शैक्षणिक सहलीही मोठ्या प्रमाणात आल्याने सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल झाली आहेत. पर्यटकांसोबतच स्वाध्याय परिवारातर्फे सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामुळे शहरातील रस्ते दिवसभर गर्दीने फुलले होते. त्याचप्रमाणे विविध संस्था, संघटनांतर्फेही कार्यक्रमांचे आयोजन केल्याने शहरात पाहुण्यांच्या गर्दीत आणखी भर पडली होती.रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर अलोट गर्दी पहावयास मिळाली. वेरूळ येथे सकाळपासूनच लेणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याने तिकीट घरावर एकाच वेळी हजार-पाचशे पर्यटकांची तोबा गर्दी बघावयास मिळाली.पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता तिकिटाचे काऊंटर वाढविणे गरजेचे होते; परंतु पुरातत्व विभागाने तसे न केल्याने पर्यटकांचे हाल झाले. पर्यटकांच्या गर्दीने वाहनतळावर वाहने लावण्यास जागा मिळत नसल्याने अनेकांनी चक्क रस्त्यावर वाहने उभी केली होती. त्याचबरोबर वाहनांच्या गर्दीने लेणीसमोर तसेच खुलताबाद-दौलताबाद घाटात ट्रॅफिक जाम होण्याचा प्रकार सतत घडत होता. त्यामुळे पर्यटक व भाविकांची प्रचंड गैरसोय झाली.पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक व्यावसायिक आनंदी होते. लॉज, हॉटेल हाऊसफुल झाले आहेत. दौलताबाद किल्ला, भद्रा मारुती मंदिर, घृष्णेश्वर मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने वेरूळला सोमवारी मोठी गर्दी होण्याचा अंदाज येथील व्यावसायिकांनी लावला आहे. शैक्षणिक सहलीच्या एस. टी. बसेस लेणी परिसरात सोडण्यात याव्यात, अशी मागणी वेरूळचे माजी सरपंच नाना ठाकरे यांनी केली आहे.एस. टी. बसेस रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करून जावे लागत असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शैक्षणिक सहलीच्या बसेस वेरूळ लेणीत सोडण्याची मागणी होत आहे. गर्दीचा आज पहिलाच दिवस होता. अजून चार दिवस पर्यटकांची गर्दी राहणार असल्याने एस. टी. महामंडळ व एमटीडीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून अजिंठा लेणीतील नियोजनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.अजिंठा लेणीत ‘अतिथी देवो भव’ला हरताळअजिंठा लेणीत एस. टी. महामंडळ व एमटीडीसीच्या गलथान कारभाराचा अनुभव आज पुन्हा पर्यटकांना आला. गर्दी वाढली की पर्यटकांची गैरसोय ठरलेलीच आहे. अनेक पर्यटकांना अजिंठा लेणी दर्शन न घेता परत फिरावे लागले.४वाहनतळावर जागा नसल्याने जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांचेही हाल झाले.अजिंठा लेणीत जाण्यासाठी टी पॉइंटवरून प्रदूषणमुक्त बसमधून जावे लागते. या बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पर्यटकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले. पर्यटकांची गर्दी होणार, हे लक्षात घेऊन येथील पोलीस अधिकाºयांनी एस. टी. महामंडळाला आधीच बससंख्या वाढविण्यासंदर्भात पत्र दिले होते; परंतु एस. टी. महामंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यटकांना दिवसभर हाल सहन करावे लागले.४काही पर्यटक बैलगाडीतून लेणीत गेले. काही पायी गेले व काही पर्यटक लेणी न बघताच परत फिरल्याने ‘अतिथी देवो भव’ला हरताळ फासला गेला. येथील व्हिजिटर सेंटरसुद्धा बंद असल्याने पार्किंगची व्यवस्था होऊ शकली नाही. पोलीस निरीक्षक शरद जºहाड, पोकॉ. राजू काकडे, मेढे, भिवसने यांनी वाहतूक सुरळीत केली.