शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पावसाच्या दडीमुळे जिल्हाभरातील पिके सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:04 IST

पैठणमधील ५७ हजार ९२५ हेक्टरवरील पिके धोक्यात तालुक्यात ८४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने जवळपास ५७ हजार ...

पैठणमधील ५७ हजार ९२५ हेक्टरवरील पिके धोक्यात

तालुक्यात ८४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने जवळपास ५७ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रातील पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. आजच्या तारखेपर्यंत यंदा सरासरी ११४. ७० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेला सरासरी २६५.९० मि.मी. पाऊस पडला होता.

सिल्लोड तालुक्यात ८२ टक्के पेरणी

तालुक्यातील ९८ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रापैकी ८३ हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या, याचे सरासरी प्रमाण ८२ टक्के आहे. मात्र, काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते पिकांना पाणी देऊन वाचवित आहेत. मात्र इतर शेतकरी दुबार पेरणीच्या सावटाखाली आहेत.

फुलंब्रीत आतापर्यंत १२५ मि.मी. पाऊस

फुलंब्री तालुक्यात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या जाेरावर बहुतांश पेरणी आटोपली आहे. पिकांची स्थिती आज जरी व्यवस्थित दिसत असली, तरी येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत तालुक्यात २९० मि.मी. पाऊस पडला होता, तर यंदा केवळ १२५ मि.मी. पाऊस झाला आहे.

कन्नडमधील ६४ हजार १७७ हेक्टरवरील पेरणी धोक्यात

कन्नड तालुक्यात आतापर्यंत १८० मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी या तारखेपर्यंत हेच प्रमाण २७६ मि.मी. इतके होते.

खरिपाच्या ९३ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रापैकी ६४ हजार १७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात कापूस व मक्याची लागवड जास्त आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे.

खुलताबादेत आजपर्यंत १३२.६६ मि.मी. पाऊस

खुलताबाद तालुक्यात गतवर्षी या तारखेपर्यंत ३३२.७७ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा मात्र पावसाने हात अखडता घेतला असून आतापर्यंत १३२.६६ मि.मी. इतकाच पाऊस झाला आहे. त्यात अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने कोवळी पिके करपत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

औरंगाबादेतील पिकांना आठ दिवसांपूर्वीच्या पावसाने वाचविले

औरंगाबाद तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी अटोपती घेतली. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी दिली. मात्र आठ दिवसांपूर्वी काही भागात झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट कोसळणार आहे.

सोयगाव तालुक्यात मका पिकांना उन्हाचा फटका

तालुक्यात पावसाच्या ओढीचा सर्वात मोठा फटका मका पिकांना बसला आहे. तालुक्यात ३८ हजार ६८० हेक्टरवर खरिपाची लागवड झाली आहे. यात २९ हजार ३९१ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. यातील १२ हजार ९६५ हेक्टरवरील कोरडवाहू कपाशी पिके धोक्यात आली आहे. तालुक्यात आतापर्यंत १४१.८ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षी हे प्रमाण १२२.२ इतके होते.

वैजापूर तालुक्यात सरासरी १०२. ६ मि. मी. पाऊस

वैजापूर तालुक्यात दीर्घ काळापासून पावसाने दडी मारली असून शेतपिके करपायला सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस न झाल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १०२.६ मि. मी. पाऊस झाला. गतवर्षी हे प्रमाण २६६.१ मि.मी. एवढे होते.

गंगापुरात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

गंगापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १२१ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण २५६ मि.मी. एवढे मोठे होते.