शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पिके गेली पाण्याखाली; शेतकºयांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 01:03 IST

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.

लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणांतून येणाºया पाण्याने जायकवाडी धरण ९० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. या पुराच्या पाण्याने मात्र कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली. परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, गळनिंब शिवार, धनगरपट्टी, भिवधानोरा आदी गावच्या गोदाकाठावरील धरण संपादित क्षेत्रात सुमारे १७०० हेक्टर जमिनीवर शेतकरी लहान-मोठी पिके घेतात. यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मूग, तूर, ऊस आदी पिकांचा समावेश आहे.नदी पात्रानजीक असलेल्या आणि धरणाची साठवणूक क्षमता २० टक्के असते एवढे पाणी पात्रात जमा राहील अशा जमिनीत लवकर येणारे पिक घेतले जाते. नदीला पाणी येण्यापूर्वीच पीक हातात येईल, याची काळजी तेथील शेतकºयांकडून घेतली जाते. तर धरणाची साठवणूक क्षमता ४० ते ५० टक्के झाल्यावर नदीची पाणीपातळी असलेल्या जमिनीत कापूस, तूर अशी पिके घेतलीजातात. दरवर्षी नदीकाठावर कसणारे शेतकरी थोड्याफार प्रमाणात पिकांपासून उत्पन्न मिळवितात. यंदा मात्र नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने आणि पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने सगळी पिके जमीनदोस्त झाली.