शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

खरीप हंगामासाठी पीक विमा योजना

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे.

पालम : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी खरीप हंगामासाठी पीक विमा योजना शासनाने लागू केली आहे. या योजनेंतर्गत १३ पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार यांनी केले आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगाम २०१४ या वर्षासाठी ही विमा योजना आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पावसात खंड पडणे, रोगराई व किडीचा प्रादूर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असते. पिकांच्या नुकसानीत क्षेत्र घटक धरून विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. ही विमा योजना मूग, उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, भात, बाजरी, कापूस, तूर, ऊस, तीळ या पिकांना लागू करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण विम्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा हप्तामध्ये १० टक्के सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी ८ अ चा उतारा, सातबारा, पीक पेरा प्रमाणपत्र व बँकेचे पैसे भरण्याचा फॉर्म असा प्रस्ताव तयार करून विमा उतरवावा लागणार आहे. यासाठी बँकेमध्ये कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याची शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)३१ जुलै विम्याची शेवटची तारीखविमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१४ आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने विमा हप्ता भरून पीक विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरेंद्र पवार, मंडळ कृषी अधिकारी अंबुलगेकर, जाधव, कृषी पर्यवेक्षक, संभाजी वाघमोडे, प्रवीण काळे, दत्ता दुधाटे, बालाजी चव्हाण आदींनी केले आहे.