शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

चलन तुटवड्यामुळे पीक विमा अधांतरी

By admin | Updated: May 8, 2017 23:29 IST

बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत

संजय तिपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप रखडले आहेत. परिणामी जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असून, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत.२०१५ मधील कापूस अनुदानापोटी जिल्ह्याला २३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रबी २०१५ वर्षातील पीक विम्याचे २१६ कोटी व २०१६ मधील खरीप पीक विम्याचे ९८ कोटी आले आहेत. शासनाकडून मंजूर झालेल्या पीक विमा रकमेचे जिल्हा बँकेकडून वाटप होते. जिल्हा बँकेच्या एकूण ५९ शाखा आहेत. त्यापैकी २ शाखांचे कार्यक्षेत्र शहरी आहे. त्यामुळे ५७ शाखांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामच उरले नाही. जिल्हा बँकेने अग्रणी बँकेकडे मागणी करूनही आवश्यक त्या रकमेचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे विमा रकमेचे वाटप रखडले आहे.ऐन लग्नसराईत पीक विमा रक्कम मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पैसे पदरात पडण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेत खेटे मारावे लागत आहेत. बँक अधिकाऱ्यांकडून पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर वादही होत आहेत. लग्नसराई, बांधकाम व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. मात्र, अशा अडचणीच्या वेळीच बँकेत खडखडाट आहे. उसनवारीसाठीही अनेकानी हात आखडता घेतल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.